Friday, 20 January 2017

नर्मदा परिक्रमा भाग 43 to57


💐  जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- भाग ४३
उठण्याचा प्रश्नच नव्हता कारण अक्षरश: रात्रभर जागा होतो कारण खूपच थंडी आहे आजूबाजूला दाट झाडी व पांघरायला फक्त एक शाल स्वेटर नाही खरोखर स्वामी कसे काय झोपले आश्चर्य आहे असो
पहाटे ३.०० वाजता ध्यान साधना केली नंतर ओहळावर  स्नान  केले खुपच थंडी वाजतेय पण स्वामींकडे बघून थंडी दूर करायचा प्रयत्न करतोय असो
स्वामींना चहा किंवा मला दूध असे काही नाही साधना, पूजा झाली नंतर सर्व आवरून पुढे निघालो धरा धवल घाट येथे दुपारी आलो दुपारी येथे थांबायचे ठरविले तेथे एका भिल्लाने कोरा चहा दिला मी तेथेच स्नान करून दुपारची साधना केली स्वामींना येथे एका झोपडीतून भाकरी व डाळ भिक्षा मागून आणली असो
दुपारची विश्रांती घेऊन पुढे निघालो काकराडा व पुढे देववाडा  येथे आलो रात्री येथे  मुक्काम  करायचे ठरवले तेथीलच जवळपास कोरडी भिक्षा मागून चपाती बनवली व स्वामींकरता डाळ बनवली नंतर  स्नान करून साधना ,पूजा केली मग स्वामींना भोजन दिले मी पाण्याबरोबर चपाती खाल्ली सर्व आवरून स्वामीसमोर बसलो कारण कालच विषयी ते पुढे बोलणार आहेत।
स्वामीनीं बोलण्यास सुरवात  केली महाराजानी त्या व्यापाऱ्याला बोलावणे पाठवले  तो व्यापारी आल्यावर त्याला स्वामींनी ती चांदीची वाटी परत दिली तो व्यापारी म्हणाला अहो महाराज  मी बघितले होते पण आपण इतके ज्ञानी व सत्शील आहेत मला एका वाटीने काहीच फरक पडत नाही पण तुम्हाला वाटी दिलीतर मला पुण्य मिळेल
म्हाराजांनीं त्याला विचारले  की तुम्ही काय करता त्यांनी सांगितले मी व्यापारी आहे महाराज म्हणाले तुम्ही चोरी लांडी  लबाडी  करता का तो व्यापारी म्हणाला आपण श्रेष्ठ आहात आपल्याशी काय खोट बोलायचे मी खरं सांगतो व्यापारात खोट चोरी लांडी लबाडी थोडी होतेच म मी महाराज म्हणाले अरे तुझे अन्न खाल्ले व मला ही तशीच बुद्धी झाली
स्वामी म्हणाले म्हणून अन्नाला दोष आहेत मी म्हणालो स्वामी मी एक विचारू का ह्या करता काय करावे संन्याशी तर भिक्ष घेतात त्यात तर अन्न असते किंवा ब्राम्हण म्हून कुठे जेवायला जातो किंवा शिष्या घरी जेवणाचा प्रसंग येतो असे घडत म काय करावं
स्वामी म्हणाले फार सुंदर प्रश्न मी हे सविस्तर तुला उद्या सांगेन झोप आता
क्रमश:----
परत स्वामींनी उत्सुकता वाढवली पण आज मी जास्त विचार करायचा नाही ठरवलं
लेखक श्री विश्वास वाड

💐   जय  गुरुदेव   💐
🌹 क्रमश:--- भाग ४४
पहाटे ३.०० वाजता उठलो ध्यान स्नान संध्या पूजा करून  पुढे निघायचा  तयारीत  होतो  तेवढ्यात स्वामी म्हणाले तुझ्या  सर्व वस्तूंकडे नीट बघून  घे कारण आज नंतर तुझ्याकडे ह्या वस्तू राहणार  नाही ते ऐकून मला आश्चर्य  वाटले मी विचारले म्हणजे काय स्वामी म्हणाले काही नाही चल आता पुढे काय होते ते मला खरंच काही समजले नाही बघू काय होते ते  असो
   आम्ही पुढे  निघालो उमर मांडवी येथून  टेपरानी येथे दुपारी  पोहचलो  दुपारी येथे थांबायचे ठरवले  येथे एका झाडाखाली थांबलो व दुपारी स्नानाकरता  निघत होतो
  तेवढ्यात समोरच्या  ओहळातून चार पाच धडधाकट व्यक्ती आल्या त्यांच्या हातात कुऱ्हाड व तिर कामट्या होत्या ते पाच जण होते आमच्या समोर आले त्यांनी प्रथम स्वामींना विचारले आपके पास क्या  है स्वामीनीं सांगितले फक्त पंचा  है  त्यांनी महाराजांचा  पंचा घेतला मग माझी पिशवी घेतली त्यातून फक्त मैय्या व मैय्याच्या पूजेचे सामान परत केले व बाकी सर्व सामान  त्यांच्या जवळ घेतले मी मागायचं प्रयत्न केला  तर  त्यातील दोन जणांनी रागाने  बघितले  व बोलले आप परिक्रमा कर रहे हो आप साधू बने हो तो ये चिजोंकी आपको क्या जरुरत त्यांनी मला व स्वामींना फक्त   दोन दोन  रामदास ( लंगोट ) लज्जा रक्षणकर्ता दिले  व ते निघून गेले
    स्वामी जोरजोरात हसायला लागले  मला काहीच समजत नव्हते रडावं ओरदाव का हसावं कारण अंगावर फक्त रामदास व समोर झाडाला अटकवलेली मैय्या व तिचे पूजेचे सामान बाकी काही नाही मी निशब्द खाली बसलो आता पुढे काय
  स्वामी म्हणाले आता कसला विचार करतोयस  दुपारची साधना नाही की करणार पुढे पण जायचंयन मी म्हणालो असं ते म्हणाले अरे भिल्ल काय म्हणाले साधूला काही लागत नाही साधूला कश्याही अवस्थेत राहता आलं पाहिजे जो कश्याही अवस्थेत दुःखी व आनंदी  होत नाही तोच खरा निर्विकार  व स्थीतप्रज्ञ साधक उठ जा स्नानाला
मी उठलो स्नान केले  संध्या दुपारची साधना केली आणि  बसलो तेव्हड्यात त्या  भिल्ला  पैकी एक भिल्ल कोरा चहा घेऊन आला मी त्याला सांगितले मेरा जप चालू है  मै नहि लेता स्वामींनी चहा घेतला त्या भिल्लाने विचारले भोजन करोगे मी नाही म्हणालो स्वामी पण नाही म्हणाले
मी म्हणालो भोजन मत दो सिर्फ एक धोती दे दो तो म्हणाला महाराज मेरे घर चलो दो दिन तीन दिन जितना दिन रुकना है रुको मै सेवा करुंगा  लेकीन सांमान भूल जाओ तो निघून गेला थोडा वेळ थाबुन तेथून  निघालो हातात फक्त काठी व महाराजांनी  दिलेला तुंबा व मैय्याची पिशवी
तुंब्याबद्दल बोलायचे तर ते भिल्ल तुंबा पण नेणार होते पण मी सांगितले हा माझा नाही माझ्या सद्गुरुंच्या आहे  तुम चाहो तो मेरी जान  लेलो पर  मै ये नाही दुंगा  बराच वेळ मी देत नाही पाहून त्यातला एक भिल्ल कुऱ्हाड घेऊन माझ्यावर धावला पण तरी मी देत नाही पाहून एका भिल्लाने हसून सांगितले ठीक है राहने दो असो
मन अस्वस्थ होते कारण  अंगावर एक रामदास सोडला तर काही नव्हते मन अस्वस्थ हिते जप होत नव्हता चालत होतो
तेवढ्यात स्वामी ओरडले अरे कितीही विचार केला तरी सामान परत येणार नाही वेळ का वाया घालवतो जप बंद का केला जप कर मी जप चालू केला
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव   💐
💐 क्रमश:-- भाग ४५
रस्त्याने चालत होतो पण डोळ्यासमोरील दुपारचा प्रसंग काहीही केल्या जात नव्हता काय झालंय  काय होतंय काय होणार आहे  काहीच  कळत नव्हतं मनस्तिथीच वर्णन करणं सुद्धा अशक्य मनात प्रचंड वादळ होते
      सामान  भिल्लांनी  घेतलं त्याच दुःख नव्हतं पण जी आत्ता अवस्था होती त्याच वैषम्य वाटत होते कारण रस्त्याने चालायचं व अंगावर फक्त रामदास त्यामुळे मनात गोंधळ होता किती दिवस अशी अवस्था राहणार कळत नव्हते दुसरा विचार येत होता अश्या प्रसंगाने निर्विकारिता येईल? निरासक्त होण्याकरता अशे प्रसंग येतात का ? का  देहावरील आसक्ती जाण्यासाठी म्हणजे लाज लज्जा याविषयी मनाची  चंचलता बघण्यासाठी असे घडले ? काहीच कळत नव्हते रस्ता कापत होतो  पण जप होत नव्हता रस्त्याकडे लक्ष नव्हते
इतक्यात स्वामी जवळ आले खांद्यावर हात ठेवला अरे किती विचार करशील अरे ते तर किरकोळ सामान होत एक दिवस न दिसणारा कोणी येईल व हे  शरीर  सुद्धा सोडायला सांगेल  आणि सोडायला सांगेलच असं नाही तर सोडून द्यावा लागेल तर काय करशील अरे जिथे तुझ्या देहावर तुझा अधिकार नाही म्हणजेच देह तुझा नाही तर ते सामान गेल्याबद्दल का खेद करतो
मी म्हणालो स्वामी तस नाही मला सामानाची आसक्ती नाही पण आता जी अवस्था आहे तिचे चालताना लाज वाटते स्वामी परत हसले अरे तू साधक आहेस न मी साधक प्रथम सद्गुरू व नंतर परमात्मा यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही विचार करत नाही आपण त्या झाडाखाली बसू तुझं मन शांत करणं हे मी तुझा सद्गुरू म्हणून कर्तव्य आहे  एवढा विषणणं होऊ नकोस अजून तर  तुला आयुष्यात साधनेद्वारे फार पुढे जायचे आहे आदर्श निर्माण करायचा आहे मी तूला काही सांगतो ऐक
क्रमश:---
स्वामी बोल्ट होते कां ऐकत होते मन समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते पण स्थिर हिट नव्हते
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव   💐
🌹 क्रमश:--- भाग  ४६
स्वामींनी   एका झाडाखाली बसवले मनात खरंच खूप वादळ होते स्वामी म्हणाले पहिले शांत हो आणि पहिले ठरव तुला कसलं वाईट वाटतंय तुझ्या मनात झालेल्या घटनेबद्दल अनेक विचार येतायेत  म्हणून गोंधळ होतोय
एक एक गोष्टीचा बद्दल विचार केलास तर आपोआप  उत्तरे सापडतलं जातील
स्वामी म्हणाले माणसाचे असेच होते जेंव्हा घटना घडते तेव्हा माणूस कधीहि एक विचार करत नाही तो अनेक विचारांचे  मोहळ  मनात घोळवतो त्यामुळे त्याची अस्वस्थता वाढते असो
आता तुझ्या आज घडलेल्या प्रसंगाबद्दल बघू  मुळात तुला वाईट कसले वाटते तर आपण एक एक प्रश्न बघू
१) तुला सामान गेले त्याच वाईट वाटत का?
तर हे बघ ते सामान आयुष्यभर थोडीच पुरणार होत त आत्ता पर्यंत तुझ्या हातातून किती वस्तू हाताळल्या गेल्या त्या परत आल्या का तर तुला त्याच वाईट वाटतंय का नाही रे कुठल्याही गोष्टीत किंवा वस्तुत व्यक्तीत तू मन गुंतवल  तर त्या  सर्वां विषयी माया  निर्माण होते पण ह्या सर्व  गोष्टी सोडून जाणार आहेत किंवा सोडाव्या लागणार आहेत हे जर मनाशी घट्ट केलं तर  कोणताही त्रास होत  नाही
२) तुला असं वाटत सामान गेलं तर दुःख नाही पण असं फक्त रामदास ( लंगोट ) वर क्स चालायचं
तर तू स्वताला साधक म्हणवतोस साधकाला आपल्या शरीराची तमा नसावी जर तू साधक आहेस तर तुझे सर्व मन विचार व कृती हि फक्त साधनेशी  बांधील असावी  इतरत्र कुठेही नको म शरीरावर वस्त्र नाही तर लोक काय म्हणतील  ह्या कडे लक्ष जाणारच नाही रे तू तर वस्त्राच्या करता लोकांचा विचार करतो बघ  संत गोराकुंभार आपल्या नांसमरणाच्या साधनेत इतका मनस्वी एकरूप होता की त्याचे बाळ त्याचा पायाखाली आले तरी त्याला कळले नाही इतकी एकरूपता जर साधनेत आलीस तर लोक लाज  है विषयी तुला काहीच वाटणार नाही आता तुझ्या मनातल्या चाललेल्या पुढच्या वादलाविषयी
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
क्रमश:--- भाग ४७
स्वामी सर्व तऱ्हेने समजवत होते पटत पण होते पण मन हे सगळे मान्य करून सुद्धा पुन्हा पुन्हा विचारात गुरफटत होते B
मी स्वामींना सांगितले आपण जे सांगताय ते सर्व पटतंय पण मन म्हणजे काही लाईटच  बटन नाही की बंद केले कि बंद स्वामी म्हणे मान्य पण मन म्हणजे पंख्याच तर बटन आहे की बंद केल्यावर हळूहळू बंद होईल पटतंय का?
    आता बघ सामान्य माणसाचे मन हे पंख्याच्या बटनासारखे  असते की ते बटन बंद केले की हळू हळू बंद होते म्हणजेच मनातले विचार काढायचे सामान्य मनुष्याने ठरवले तर हळू हळू जातात पण साधकाचे तसे नसावे त्याचे मन हे लाईटच्या बटना सारखे असावे कि बंद म्हणजे बंद पटलं का
मला हे हि पटलं समजवण्या करता किती  सोपे उदाहरण होते
स्वामी म्हणाले बघ हेच उदाहरण मी तुला पुढे समजवतो कसे ते बघ  बटन  लावणारा म्हणजे फिटिंग करणारा एकच असतो तसेच वायर पण सारखीच असते तरी असं होत तर ह्याच कारण काय ते लाईट आणि पंखा ह्या मधील जी यंत्रणा बसवली असते ती महत्वाची असते आणि त्या यंत्रणेवर अवलंबुन असते जसे लाईट ला फक्त वायर मधून आलेली एकच सूचना त्या लाईटला समजते म्हणून तो बंद होतो पण पंख्याच तस नसत त्याला  वायर रेग्युलेटर व व त्यातील बेअरिंग ह्या मार्फत आलेल्या सुचनाद्वारे बंद होते आता हे सगळं मनाला लावून बघ
साधक हा सुद्धा लाईट सारखा असतो फक्त सद्गुरू जे सांगतील तेच तो मानतो व सामान्य माणूस हा पंख्यासारखा प्रत्यकाच ऐकत असतो म्हणून त्याचा मनातले विचार जायला वेळ लागतो तर तू साधक आहेस म्हणजे लाईट आहेस  आणि लाईटचा दुसरा अर्थ  प्रकाश  म्हणजे तू एक प्रकाश आहेस त्यामुळे तू काय करायचंय ते ठरव विचार करायचा का नाही  स्वामी सांगतात ते खरोखर बरोबर होते असो
पुन्हा उठून दोघेही चालायला लागलो मन पूर्ववत होत होते म्हणजे अजपाजप सुरु झाला होता
अजपाजप करत धडगाव येथे आलो तेथील शाळेत थांबायचे ठरवले तस आमच्या अंगावर फक्त रामदास होता इकडे त्याच विशेष  नव्हते कारण इथं बरेच लोक तसे होते कारण गरिबी असो तेथील ओढ्यावर स्नान करून संध्याकाळची साधना पूजा आरती केली एका भिल्लाने स्वामींना उडदाची डाळ व भाकरी आणून दिली व मला तो  म्हणाला महाराज येथे जास्त चपाती तर नाही मिळणार एक चपाती आहे तेवढ्यात भगवा म्हणजे दूध तर नाहीच पण चपाती खुप मोठी व जाड होती चपाती  पाण्याबरोबर खायला सुरवात केली एवढं सगळं गेलं पण आनंद एवढाच होता की माझ्या महाराजांचा तुंबा माझ्या बरोबर होता म्हणजे महाराज माझ्या बरोबर होते हि भावना मनात आली आणि एवढ्यात स्वामी जोरात हसले मला काहीच कळले नाही मी विचारले काय झालं स्वामी म्हणाले आश्चर्य आहे न सद्गुरू मनात ठाण मांडून असायला हवे आणि तू  तुंब्यात बघतोय हे  ऐकून मला खुप  ओशाळल्या सारखं झालं खरोखर स्वामी माझ्यावर  किती बारीक लक्ष ठेवतात मनात काही यायचा अवकाश ते लगेच बोलतात
आवरायला काहीच नव्हतं हात धुऊन स्वामी समोर बसलो
स्वामी बोलायला लागले
क्रमश:----
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐


💐  जय गुरुदेव  💐
       🌹 नर्मदा परिक्रमा
क्रमश:---- भाग ४८
स्वामीं समोर बसलो स्वामी काय सांगतील उत्सुकता होती स्वामीनीं बोलण्यास सुरवात केली
मन काही अंशी का होईना अस्वस्थ होतेच हवेत गारठापण होता अंगावर वस्त्र नव्हते स्वामीं समोर कसा बसलो असेल फक्त कल्पनाच करा असो
स्वामी म्हणाले चोरी विषयी न बोललेलं बर कारण कितीही बोललो तरी निष्पन्न काही निघणार नाही
    ह्या चोरीचा आपण दुसऱ्या बाजूने विचार करायचा का ? आता बघ  काहींचे म्हणणे असे की हे मैय्याचा भाऊ आहेत मैय्या त्यांना लुटण्यास सांगते हे पटेल का तर मी सांगतो नाही कारण बघ ते मैय्याचा भाऊ आपण मैय्याची मूल म सांग कुठली आई मुलाला लूट असं भावाला सांगेल मी हे न पटणार म का लुटलं जात तर त्याची माझ्या दृष्टीने दोन कारणे
१) हा संपूर्ण भाग निर्जन व जँगलात असा आहे येथे जी वस्ती आहे त्या लोकांना इथे रोजगाराचे कुठलेही साधन नाही म ह्याचा उदरनिर्वाह कसा व्हायचा तर शास्त्र सांगते
"जीव जीवस्य जीवनं" म्हणजेच है लोकांना आप्लाउदर निर्वाह करता हे करावं लागतं असेल  आणि अजून एक बघ त्यांच्यात माणुसकी आहे बघ आपल्याला लुटलं तरी मला  चहा दिला जेवणाविषयी विचारले म्हणजे हे खरे चोर नाही तर आपल्या उदर निर्वाह करता ते हे कर्म करतात
२) ते  परिक्रमावासीयांनाच  लुटतात  का तर  बघ  आपण  परिक्रमा सुरवात  करतांना  संकल्प सोडून साधू तत्व  आवलंबतो  म्हणजेच  त्याग प्रवृत्ती  अंगिकारतो  म  आपण  खरंच  निरासक्त व विरक्त आहोत का हा प्रश्न आपल्याला  चोरी झाल्यावर  आपल्या विचार  प्रवृत्ती  वरून कळते आणि आपण  खरंच  मैय्या करता व साधनेकरता  एकनिष्ठ आहोत का नाही ते कळेल  असो
आता  सध्या तू करत असलेल्या साधनेबद्दल बोलू  ह्या साधनेद्वारे तुला जे प्राप्त व्हायचे ते होईल पण ही साधना करतांना किती एकनिष्ठता अंगी असावी तू खूप  नियम पाळतोस न चुकता जप करतोस त्यामुळे  तुला शारीरिक त्रास सहन करावा लागतो तुला मानसिक शांतता मिळते पण प्रश्न असा आहे की तू एवढे कडक नियम पाळतोस गुरु वाक्य प्रमाण मानतोस  तरी तुला त्रास होतोय थोडक्यात माणूस जितका  इश्वरनिष्ठ असतो तितका त्याला त्रास होतो हे संतांपासून चालत आलय असं का या हा प्रत्यकाचा मनात प्रश्न येतो की असं का ह्याच उत्तर आपण उद्या बघू
क्रमश:----
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय। गुरुदेव  💐
             🌹 नर्मदा परिक्रमा 🌹
क्रमश:-  भाग ४९
स्वामी बोलत होते मी स्वामीना म्हणालो स्वामी हे तर सविस्तर सांगायचं पण माझया मनात काही शंका आहेत विचारू का ?
स्वामी हसले आणि म्हणाले विचार  स्वामी
  *साक्षात्कार म्हणजे काय ?*
  स्वामी हसून म्हणाले खुपच सुदंर प्रश्न ह्याचे उत्तर खूप मोठे आहे कारण ह्याचा अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होतील आता आपण एक एक बघू पहिले नुसतं साक्षात्कार
आपले जीवन हाच एक साक्षात्कार आहे.
आपण  जिवंत आहोत हाही साक्षात्कारच आहे. तसे पाहिल्यास
श्वासोच्छ्वास हाच साक्षात्कार आहे.
इच्छा, आकांक्षा कमी कमी होणे हा साक्षात्कारच आहे.
आपण निश्चळ होणे हा साक्षात्कार; यासारखा दुसरा
साक्षात्कार नाही. निर्विचार स्थितीत रहाणे हा मोठा
साक्षात्कार आहे.
साक्षात्कार म्हणजे काही गौडबंगाल नाही. साक्षात्कार
ही खरे म्हणजे सहज स्थिति आहे. खरे म्हणजे साक्षात्कार
सतत कायम आहे. रात्रंदिवस साक्षात्कार आहे. साक्षात्कार
अखंड असतो. तो निराळा कसला व्हायचा ? फक्त आपण
त्याचे जवळ नसतो. ज्याचा आपल्याला अनुभव घ्यावयाचा
आहे, त्याच्याजवळ आपण गेले पाहिजे.
साक्षात्कार जरी सतत आहे, तरी जेव्हा जेव्हा
चैतन्याचा प्रकर्ष होतो, तेव्हा तेव्हा साक्षात्कार जाणवतो.
उदा. पाणी सतत वहातच असते. त्याचा कारंजा उडू लागला की
तो दृश्य होऊन जाणवतो. तद्वत चैतन्य आहेच. त्याचा
प्रकर्ष झाला की साक्षात्काराची जाणीव होते.
संत, सद्गुरु जे चैतन्य दाखवितात, त्याचा साक्षात्कार
करून घ्यावयाचा आहे. चैतन्याच्या सागरात स्वत:ला झोकून
देऊन, उसळणार्या लाटा पहाणे हा साक्षात्कार. चैतन्याची
हालचाल पहाणे हा साक्षात्कार. चैतन्याने चैतन्याशी
तादात्म्य होऊन, चैतन्याची अनुभूति घेणे हाच साक्षात्कार.
श्वासांचे घर्षण झाल्याविना चैतन्याचा प्रकर्ष होत
नाही. श्वासांचे घर्षण होण्यास नासिकाग्रावर दृष्टि असणे
आवश्यक आहे. वायूची घासणी झाली की `चक' होऊन `झक'
होते.
चैतन्यात नाद व प्रकाश हे दोन्ही आहेत. साक्षात्कारात
नाद व प्रकाश यांचा अनुभव येतो. हा नाद संघाताविना असतो
आणि हा प्रकाश तेल-बत्ती, चंद्र-सूर्य, अग्नि-वीज
इत्यादिविना असतो.
साधन करणार्याला चैतन्याचा अनुभव वेगवेगळया
प्रकारांनी येतो. एकाला जो अनुभव आला तोच दुसर्याला
येईल असे नाही.
प्रश्न : आत्मसाक्षात्कार म्हणजे काय?
स्वामी म्हणाले आता खुप रात्र झालीय झोप आता उद्या बघू
क्रमश:---
नाईलाजास्तव उठलो विषय खूप चांगला चालू होता पण गुरुआज्ञा
लेखक श्री विश्वास वाड


💐  जय  गुरुदेव  💐
             🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:-- भाग ५०
खरं सांगतो एखाद्या गोष्टीचा मनापासून त्याग होत नाही तो पर्यत त्या वस्तू अतयंत गरज भासते मनापासून त्या गोष्टीचा त्याग झाला तर काहीच वाटत नाही मला काय म्हणायचे हे आपणास नक्की समजले असेल  असो
     नुसत्या भूमीवर खरंच छान झोप येते नेहमी प्रमाणे उठलो स्नान साधना पूजा झाली एक  बर  लुटल्या पासून आवरायला काहीच नाही त्यामुळे पुजा झाल्यावर  चालायला तयार आम्ही पुढे निघालो
रात्र कधी होईल असं वाटत होते कारण माझया प्रश्नांची उत्तरे मिळणार खुप आनन्द होता माझ्या मते परिक्रमा हि अतिशय सार्थकी लागत होती ह्या सर्वाला मी एकच उपमा देईन कि एखादया  उपाशी माणसा समोर पंचपक्वांनाचे  ताट ठेवल्यावर त्याची जी अवस्था होते तीच माझी होती असो
दिवसभर चालून मुलगी है गावी आलो रस्त्यात मोठे पहाड लागले एक दृष्टीने चोरी झाली हे चांगलेच कारण पहाड चढताना सामानाचे ओझे नव्हते  मलगी येथे एका झोपदीबाहेर राहायचे ठरवले  तेथे स्नान साधना पूजा आटोपली झोपडीतून त्या मैय्या भक्ताने स्वामींना  भोजन दिले मला चपाती दिली भोजन झाले स्ववामी समोर बसलो
स्वामी हसले म्हणाले  फार अधीर  झाला आहेस ऐकायला साधना व आध्यात्म समजून घेण्याकरता एवढीच  अधीरता आवश्यक आहे ठीक आहे
आता कालचा राहिलेला प्रश्न
आत्मसाक्षात्कार म्हणजे काय?
तर सगळया कल्पनांचा निरास म्हणजे साक्षात्कार. मन,
जग, विषय, व्यवहार, देव, परमार्थ इत्यादि सर्व कल्पना
आहेत. कल्पनेचा निरास होतो तेव्हा आत्मवस्तु दिसते.
कल्पनेचा निरास म्हणजे ब्रह्मवस्तूची ओळख.
आत्म्याचे दर्शन होणे, आत्म्याचा साक्षात्कार घेणे
किंवा होणे म्हणजे ज्या मूळ स्वरूपातून हे विश्व निर्माण
झाले, त्या मूळस्वरूपाप्रत पोचणे व तेच होऊन जाणे. आपण
सर्व जीव मूळ स्वरूपातून निघालेले आहोत; परंतु उपाधीच्या
योगाने आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडला आहे.
तो विसर दूर होऊन आत्मरूप होणे म्हणजे आत्म्याला पहाणे
होय.
आत्मसाक्षात्कार टप्प्याटप्प्यांनी होतो. रिद्धीसिद्धि
प्राप्त होणे हाही एक टप्पा आहे. त्याच्या पलीकडे खरा
साक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कारात नाद, बिंदु, कला व
ज्योति हे टप्पे आहेत. हा नाद संघाताविना असतो. आणि हा
प्रकाश तेल-बत्ती, चंद्र-सूर्य, अग्नि-वीज इत्यादिविना
असतो.
परमेश्वराचा किंवा आत्म्याचा साक्षात्कार ही एक
अवस्था आहे. साधनातील प्रकाशदर्शन हा परमात्म्याचा
साक्षात्कार आहे. साधनात प्रत्ययाला येणारा नीलप्रकाश
म्हणजेच परमात्म्याचा साक्षात्कार.
म मी विचारले स्वामी
आत्म्याला पहाण्याची दृष्टि कोणती आहे ?
आत्म्याला पहाण्याचे कार्य कोणता डोळा करतो ?
स्वामी हसून म्हणाले
आत्मवस्तु ही निर्विकल्प आहे. निर्विकल्प वस्तु
म्हणजे आत्मा आणि सविकल्प वस्तु म्हणजे दृश्य; त्या
दोहोंत फरक आहे. दृश्य वस्तूची स्थिति बदलते; निर्विकल्प
वस्तूची स्थिति बदलणारी नाही. आत्मा निर्विकल्प
असल्याने, कल्पनेचे द्वारा आत्मवस्तूचे दर्शन होत नाही.
जेथे कल्पनेचे अस्तित्व आहे, तेथे आत्मारामाचा अनुभव
नाही.
चर्मचक्षूने आत्मा दिसत नाही. परमात्म्याला पहायचे
असेल, तर आपल्या दृष्टीतील दृश्य दूर झाले पाहिजे. आणि
परमात्म्याला पहाण्याची विशिष्ट दृष्टि प्राप्त व्हावयास
हवी. ती दृष्टि सद्गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून
सद्गुरु कृपा ही परमार्थात आवश्यक आहे.
परमात्मा निश्चळ आहे. तो निश्चळ बुद्धीकडून ग्रहण
केला जातो. चत्वार देहांचा निरास झाल्यावर, जी बुद्धी रहाते
तिच्याकडून आत्मा ग्राह्य आहे.
आपल्या देहात चंद्र व सूर्य या दोन गति आहेत. इडा
पिंगला म्हणजे चंद्र सूर्य. त्या गतींचा मारा जेथे होतो तेथे
आत्मसाक्षात्कार होतो. चंद्रसूर्याचा लोप झाला की
अग्निरूप आत्म्याचा लोट दिसू लागतो.
प्राणाची धारणा ज्यावर आहे, त्या जीवनावर लक्ष
ठेऊन दृष्टीची एकाग्रता झाली की आत्मप्रकाश दिसतो,
आत्म्याचे दर्शन होते. श्रीगुरूंनी सांगितलेल्या गतीत दृष्टि व
कान यांचा लय झाला म्हणजे ही गति ऊर्ध्वमुख होऊन वाहू
लागते. मग हीच गति डोळयाचे काम करू लागते. ही गति जेथे
पडते त्या ठिकाणाला डोळा म्हणतात. या डोळयानेच/दृष्टीनेच
आत्मस्वरूप पहाता येते. परमात्मा हा वायुस्वरूप आहे.
त्यामुळे त्याला पहाण्याचा डोळाही वायुस्वरूप आहे. एकदा
का नामगतीची व प्राणगतीची एकता होऊन, तो डोळा, ती
दृष्टि बनली की त्या दृष्टीचा विषय आत्मा हाच होतो. या
डोळयाला कुणी ज्ञानचक्षु म्हणतात. गुरुकृपा असेल तरच
आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक असणारा डोळा लाभतो.
म  मी विचारले स्वामी आत्मसाक्षात्कार केव्हा होतो वा खरोखर छान आसक्ती आहे पण हे उद्या बघू
क्रमश:---
मन थोडे खट्टू झाले पण नाईलाज उद्याची वाट बघावीच लागणार
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
         🌹नर्मदा परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--भाग ५१
नित्यनियमाप्रमाणे उठून ध्यान साधना जप पूजा सर्व आटोपले व निघायची तयारी झाली स्वामींनी विचारले अरे तुझया नाग मंत्राच्या साधनेला किती दिवस झाले अजून किती दिवस आहे मी म्हणालो स्वामी माफ करा पण खरं सांगतो मी दवसच मोजत नाहीए  मला खुप छान  वाटतंय आतंर्गत अतिशय बदल झाला असे जाणवतंय आणि आपण बरोबर आहात  व इतकि  सुंदर परिक्रमा  व साधना होत आहे त्यामुळे किती दिवस झाले हे मोजायलाच विसरलोय रात्री निवांत ह्या विषयी  बघेन पण जास्त दिवस झाले तर काय हरकत साधना होतेय हे माझ्या  दृष्टीने  फार महत्वाचे स्वामी म्हणाले वा असेच गुण साधकामध्ये असणे महत्त्वाचे अश्या शिष्यविषयी गुरूला सुद्धा अभिमान असतो मी म्हणालो स्वामी स्तुती नको अहं येईल स्वामी म्हणाले असो
रस्ता चालण्यास सुरवात केली खरच विचार आला  की किती दिवस झाले मोजलेच नाही
   आणि स्वामी सांगतात त्या विषयामुळे नाग मंत्राची अनुभूती आपल्या पर्यंत मी पोहचवलीच नाही माझ्या मते परिक्रमा व साधना अशीच असावी जेव्हा आपण सर्व विसरतो तीच साधना आणि तशी गुरुकृपेने माझ्या कडून होते आहे हा गर्व नाही पण अभिमान नक्कीच आहे असो
काठिगाव येथे दुपारी थांबून संध्याकाळी वडफळी येथ मुक्काम साठी आलो तेथे एक महाराज्यांचा कुटीत थांबायचे ठरवले  संध्याकाळची स्नान पूजा साधना करून त्या महाराजांना स्वयंपाकात मदत केली स्वामींना भोजन दिले मी दूध चपाती खाल्ली महाराजांची भाडी घासून स्वामींसमोर  बसलो
स्वामी हसून म्हणाले कालचा प्रश्न काय ?
मी हात जोडून म्हणालो स्वामी
आत्मसाक्षात्कार केव्हां होतो ?
स्वामी म्हणाले  खरंच  तुझी आसक्ती चांगली आहे
साक्षात्कार न होण्याचे कारण मी-पणा आहे.
साक्षात्कारासाठी अहंकार अजिबात उपयोगी नाही. एक
अहंकार तरी किंवा एक साक्षात्कार तरी. मी - माझे
गेल्याशिवाय अनंत जन्मातसुद्धा साक्षात्कार होणार नाही.
अहंकार गेला तर साक्षात्कार होतो. जेव्हा देहबुद्धि, अभिमान
टाकला जातो, तेव्हा साक्षात्कार होतो.
संग सुटला की आत्मारामाचा साक्षात्कार होतो. भेद गेला
तर रामाचा साक्षात्कार आहे. दृश्याचा अंत झाल्यावर
साक्षात्कार होतो. देहातीत झाल्यावरच साक्षात्कार होतो.
देहाचा आणि मनाचा संबंध सुटल्याशिवाय परमार्थातील
अनुभूति नाही.
चारी देहांची(३) शेणकुटे जळल्यावर
साक्षात्कार होतो.
चार देहांचा जेव्हा निरास होतो तेव्हाच
साक्षात्कार होतो.
संताचे कृपेने ईश्वराचा साक्षात्कार होतो.
गुरुकृपा  झाल्यावर साक्षात्कार होतो. गुरुकृपेशिवाय साक्षात्कार
नाही.
गुरुकृपेने दृष्टि प्राप्त झाली तर देवदर्शन होते.
ईश्वरदर्शनासाठी गुरुकृपेची नितांत जरुरी आहे.
गुरूंनी कृपा
केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही.
नाकातून आतले वारे बाहेर व बाहेरचे आत वहाण्याची
एवढीच क्रिया राहिली, एवढेच ज्ञान राहिले तर आत्मानुभव
दूर नाही. सद्गति म्हणजे सत अशा आत्म्याकडे नेणारी गति.
अशी सद्गति प्राप्त झाली की लगेच साक्षात्कार होतो.
नामाची लावणी - पेरणी केली तर साक्षात्काराचे भरघोस
पीक काढता येते. एकाग्र होऊन जो नामस्मरण करतो
त्यालाच साक्षात्कार होतो. नामाला स्मरणाची जोड मिळाली
की अनुभव येतो.
नामाची गति(४), मनाची गति, जीवनाची गति, प्राणाची
गति आणि उपाधिभूत(५) जीवनाची गति या ज्यावेळी एकत्र
येतात त्यावेळी स्थिर-बिंदुदर्शन होते.
नामाची गति, चैतन्याची गति व श्वसनाची गति ह्या
जेव्हा एक होतात व जीवन हे ऊर्ध्वमुख होते व ते प्राणगतीशी
भ्रूमध्यात मिसळते, तेव्हा नंतर आत्मसाक्षात्कार होतो.
विचार आणि मन यांचा लय गतीत व्हावयास पाहिजे.
अशा रीतीने प्रथम मन संथ झाले की गति प्रथम बाहेरून संथ
होते व मग आतून संथ होते. बाहेरून प्राण आत येईनासा झाला
म्हणजे देहाच्या आतील वार्याला आसनाच्या नेटामुळे
ऊर्ध्वगति मिळते व तो ऊर्ध्वमुख होऊन वाहू लागतो. ही
उर्ध्वमुख गति भ्रूमध्यात प्राणगतीशी मिसळते व नंतर
आत्मसाक्षात्कार होतो.
नामगति व प्राणगति एक होण्याची कळ साधली की
परमात्म्याचा साद आलाच. प्राणाची गति व नामाची गति एक
झाली की `आपुलिया जीवे । शिवासी पहावे । आत्मसुख घ्यावे
वेळोवेळा ।' हीच प्रचीती शिल्लक रहाते.
म  मी  विचारले स्वामी माफ करा पण एक प्रश्न आहे सामी म्हणे विचार
मी  म्हणालो  आत्म्याचे अनुसंधान म्हणजे काय ? ते कसे लागते ?
आत्मानुसंधानाचा परिणाम काय होतो ?
स्वामी म्हणाले वा  हुशार  आहेस पण ते आता उद्या मन निराश झाले सर्व ऐकण्याची व आत्मसात करण्याची प्रचंड इच्छा मनात आहे बघू गुरुकृपा कशी व किती होते नाराजीने उठून  कुटीच्या डाव्या बाजूस दगडाला उशी करून झोपायचा प्रयत्न करत होतो पण मन मात्र अस्थिर होऊन स्वामी उद्या काय सांगतील इकडे लागले होते तेव्हढ्यात स्वामी म्हणाले झोप विचार करू नको
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड


💐  जय   गुरुदेव  💐
             🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--  भाग ५२
नित्यनियमाप्रमाणे उठलो ध्यान स्नान साधना पूजा झाली आणि मनात खरोखर प्रश्न आला खरंच साधना कधी सुरु केली व किती दिवस झाले नागप्रतिमा केंव्हा विसर्जित करायची आठवतच नाही की साधना कधी सुरु झाली
स्वामी हसत होते मी म्हणालो स्वामी काय झाले स्वामी म्हणाले अरे साधना अशीच हवी आपण कधी सुरु केली व कधी संपवायची हे कळल नाही पाहिजे  असं होणं म्हणजेच साधक साधनेशी एकरूप असतो
आता एक सांग ह्या साधनेपासून तुला काय अनुभूती आली
    मी म्हणालो स्वामी खरं सांगतो  मला साधनेपासून  भरपूर  अनुभूती  आली पण तुम्ही रोज जे अमृत पाजताय  त्यामुळे त्या अनुभूतीकडे खरंच  दुर्लक्ष  झाले त्या  मातारामांचा  मी अत्यन्त ऋणी आहे त्यांनी खुप मोठी विद्या मला प्रदान केली
स्वामी म्हणाले ठीक आहे समाधानी आहेस न म  साधना चालू ठेव बघ अजून काय होत कळेल असो
मी फक्त मान डोलावली आणि आम्ही चालू लागलो अजपाजप चालू होता पण आज कधी नाही ते परत परत साधनेविषयी मनात प्रश्न येत होते शेवटी ठरवले गुरुआज्ञा  साधना चालूच ठेवायची
    चालत चालत वडफळी वरून रस्त्यात दुपारी एका झाडाखाली थाबुन रात्री  डुमखल  येथे  एका झोपडीपाशी  आलो  तेथे थांबायचे ठरवले संध्याकाळची स्नान साधना पूजा झाली झोपडीतील  गृहस्थाने  स्वामींना डाळ चपाती व मला दूध चपाती दिली
स्वामीन समोर बसलो ते म्हणाले आता काय मी म्हणालो कृपया कालचा विषय पुढे सांगावे ते हसले
   स्वामी म्हणाले ठीक आहे काल तू काय विचारलं
मी हात जोडून म्हणालो
स्वामी। आत्म्याचे अनुसंधान म्हणजे काय ? ते कसे लागते ?
आत्मानुसंधानाचा परिणाम काय होतो ?
स्वामी म्हणाले  वा काय आसक्ती आहे ऐक  अनुकंपन, अनुवृत्ति, छंद आणि अनुसंधान हे
आत्म्याच्या अनुभूतीसाठी परमार्थात असणारे चार टप्पे
किंवा चार पायर्या आहेत. श्वसनाचे अनुकंपन असते.
साधनाच्या अभ्यासाने वृत्तीवर वृत्ति उठण्याची लकब
साधणे म्हणजे अनुवृत्ति. त्या वृत्तीशी गतीचा पटीपटीने
संघर्ष होणे म्हणजे छंद. आणि हा छंद अखंडपणे लागणे/रहाणे
म्हणजे अनुसंधान. अनुसंधान हे कोणत्याही अवस्थेत टिकून
रहाते. प्रत्येक माणसाचे ठिकाणी श्वासाचे अनुकंपन चालूच
आहे. तेथे लक्ष किंवा दृष्टि लागली की अनुकंपन होते. त्यात
वृत्ति तदाकार झाली की अनुवृत्ति साधते; त्याशिवाय मनात
इतर कोणताही विचार येता कामा नये; षड्विकार दूर झालेले
असले पाहिजेत. अशी तऱ्हा झाली म्हणजे छंद लागतो. छंद
म्हणजे त्याशिवाय दुसरे काही न सुचणे. असा छंद लागला
म्हणजे कोणतीही गोष्ट साध्य होते आणि मग परमात्म्याचे
अखंड अनुसंधान लागते. आत्म्याखेरीज अन्य काही नाही,
सर्व काही आत्माच आहे, अशी जाणीव असणे म्हणजेच
आत्म्याचे अनुसंधान लागणे.
श्वसनात नाम आहे. नाम म्हणजे चैतन्याचा नाद. चैतन्याचा
नाद म्हणजे नाम हे सूत्र आहे. नादाने नाद घेणे हेच
नादानुसंधान आहे. नादानुसंधानाने नादाचाच बिंदू होऊन तो
प्रगटपणे साधकास दृष्टीसमोर दिसू लागतो. नादानुसंधान,
नामस्मरण, आत्मानुसंधान, स्वरूपानुसंधान आणि
आत्मसाक्षात्कार हे सारे शब्द एकच अर्थ सांगणारे आहेत.
मी म्हणालो स्वामी  आता एकच शेवटचा प्रश्न
आत्मसाक्षात्कार देहात कुठे होतो?
स्वामी  म्हणाले खरोखर  हुशार आहेस हळू हळू सगळं जाणून  घ्यायची  इच्छा  चांगली जस तुला अभिमान आहे की महाराज व माझ्या सारखे तुला  सद्गुरू लाभले तस  आम्हाला  सुद्धा अभिमान आहे की तुझ्या  सारखा  मुमुक्षु  शिष्य आम्हाला मिळाला हे  ऐकून  डोळे भरून आले पण गर्व नाही झाला कारण स्वामींनी स्तुती केली हे ठीक पण माझे उद्दिष्ट् फार वेगळे आहे असो
स्वामी म्हणाले रोजच्या प्रमाणे तुझा प्रश्न उद्या झोप आता
क्रमश:-
खरंच आजचा सुदिन म्हणावा का कारण स्वामींनी मला शाबासकी दिली साधना व नियम चालुच ठेवायचे ठरवले
लेखक श्री विश्वास वाड



💐  जय  गुरुदेव  💐
                🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश:-–-भाग ५३
नित्यनियमांने  प्रातःकाळी उठून ध्यान स्नान पूजा साधना करून पुढे निघालो आज स्वामी सकाळपासून काहीच बोलत नव्हते त्यामुळे खुप विचित्र वाटत होते आपलं काही चुकलं का असा प्रश्न पण पडत होता साधारण चालून  एक तास झाला तरी स्वामी फक्त मागे चालत  जाते
    खुप अस्वस्थ वाटायला लागलं पण स्वामींना विचारायची हिम्मत होत नव्हती शेवटी डोळ्यात पाणी आले अजपाजप तर चालूच होता काय करावे कळत नव्हते
     शेवटी स्वामींनी आवाज दिला मी थांबलो स्वामी जवळ आले म्हणाले काय झालं ? का रडतोयस ? मी म्हणालो स्वामी आज सकाळ पासून आपण बोलत नाही काय झाले माझे काही चूल का मला त्याच वाईट वाटते
    स्वामी म्हणाले अरे तस काही नाही तू काही चुकला नाहीस एवढं वाईट वाटत तर विचारायचं असो चल आता आपण रस्त्यात बोलत नाहीं न  असं म्हणून  डोक्यावरन हात  फिरवला  खूप खूप बरे  वाटले  मन खूप शांत झाले असो
    पुढे  कणजी वरून दुपारी माथासर  येथे येऊन माध्यांनी  येथे थांबलो तेथून पुढे  संध्याकाळी  मोखाडी येथे पोहचलो  तेथे एका  कुटिया पाशी थांबायचे  ठरवले  तेथिल  महाराजांनी  सदावर्त ( शिधा ) दिला भांडी दिली म मी स्वामींन करता डाळ व चपाती बनवली नंतर स्नान साधना पूजा करून स्वामींना भोजन दिले मग मी चपाती  ( दूध  न मिळाल्याने ) पाण्याबरोबर खाल्ली नंतर सर्व आवरून स्वामींनपाशी  बसलो  कि ते काय सांगतील  उत्सुकता  होती
स्वामिनीं बोलायला  सुरुवात केली स्वामी म्हणाले तुझा काळ प्रश्न होता
आत्मसाक्षात्कार देहात कुठे होतो? बरोबर ना तर ऐक आता
खरे म्हणजे आत्मा नाही अशी जागाच नाही. तथापि
आम्हाला आत्मा प्रथम बाहेरच्या जगात कुठे दिसत नाही.
प्रथम आत्मसाक्षात्कार देहात होतो.
शरीर हे आत्मसाक्षात्काराची प्रयोगशाळा आहे. ती
विनावेतन चालविता येते. मस्तक हे देवघर आहे. जरी
आत्मसाक्षात्कार देहात होतो, तरी देहाने आत्मसाक्षात्कार
होत नाही.
भूमध्यात प्राणगति व उपाधिभूतजीवनाची ऊर्ध्वगति
यांची गाठ पडली की प्राणगति डाव्या बाजूने परत न जाता
सरळ मार्गाने श?र्टकट घेऊन सहस्रदल(६) स्थानात जाते.
तेथेच आत्मसाक्षात्कार होतो. म  मी विचारले स्वामी
आत्मसाक्षात्काराने, आत्मानुसंधानाने काय होते ?  स्वामी म्हणाले तळमळ शांत झाली तर देवाला पाहिले असा त्याचा
अर्थ. देवदर्शनाने तळमळ शांत होते.
साक्षात्कार होऊन जर अहंकार रहात असेल तर
साक्षात्कार खरा आहे की नाही ही शंका आहे. साक्षात्काराने
अहंकाराचा निरास होतो.
साक्षात्कारात जे आत दिसते तेच डोळे उघडल्यावर
बाहेर दिसावयास हवे. बाहेर जर नुसतेच आकार-विकार दिसू
लागले तर साक्षात्कार झाला नाही असा अर्थ होतो.
आत्म्याचे दर्शन/आत्म्याचा साक्षात्कार ज्याला झाला
त्याला प्रत्येक गोष्टीत आत्माच दिसत राहतो.
ज्याचे आत्म्याकडे अनुसंधान लागले आहे, त्याचे मन
विचाररहित आणि विकाररहित असते. त्याची दृष्टि
विकाररहित असल्याने, ती सायकलच्या हँडलप्रमाणे
इकडेतिकडे गरागरा फिरत नाही.
ज्याला आत्मानुसंधान लागले आहे त्याला सर्वत्र
आत्मवस्तु प्रतीत होते. साधन करताना त्याला जे आत
दिसते, ज्याचे इंप्रेशन त्याच्या मेंदूवर होते, त्याच
आत्मवस्तूचे इंप्रेशन त्याला इतर कोणतीही वस्तु पहाताना
होते; त्या वस्तूच्या उपाधीचे इंप्रेशन होत नाही. त्यामुळे
साहजिकच त्याच्या दृष्टीत सुखदु:खाचे विकार उमटू शकत
नाहीत; त्याचे समाधान भंग पावत नाही. त्याचा देह व्यवहारात
काहीही करीत असला तरी त्याला सर्वत्र आत्म्याचे
समाधानच मिळत
स्वामींनी विचारले  मी समजून घेण्याचा प्रयत्न  करतो अरे तीन दिवसात मी जे जे बोललो ते नीट आठ्व म्हणजे सगळं समजेल अवघड नाही आणि जो विरक्त  होऊन साधना करतो त्याला तर समजायला काहीच अवघड नाही असो झोप आता
क्रमश:---
खरंच स्वामी जे बोलले  ते सगळं अंतर्मुख  करायला लावणार  आहे
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
               🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश;---  भाग---५४
प्रातःकाळी उठून ध्यान साधना  संध्या पूजा झाली गरुडेश्वरावरून दूध आले ते स्वामींना साखर घालून गरम करून दिले व मी नुसते गरम करून घेतले पाच सहा दिवसां नंतर खांद्याला परत  पिशवी आली असो
पुढे निघालो गरुडेश्वरासमोर असलेल्या इंद्रवर्णमहादेवाचे दर्शन घेऊन पुढे मैय्या च्या कडेने पुढे नाणी रावल येथील महादेव मंदिरातील रामबाबा आश्रमात दुपारी थांबून पुढे संध्याकाळी  योगांनन्द आश्रमात मुक्कामी गेलो
संध्याकाळचे सर्व आटोपून रात्री स्वामींसमोर बसलो कालच्या उरलेल्या सहा गुरूंविषयी उत्सुकता होती स्वामींनी बोलण्यास सुरवात केली  स्वामी म्हणाले काळ सहा प्रकारचे गुरु झाले आता पुढील
७ ).🌺  चंद्रगुरुः चंद्र उदय पावतांच चंद्रकांतास पाझर फुटतो , त्याप्रमाणें याचें अंतर द्रवतांच दूरचे शिष्यही तरतात .
८ ). 🌺 दर्पणगुरुः आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसतें . त्याप्रमाणें त्याच्या नुसत्या दर्शनानें स्वरूपज्ञान होतें . कसलेच आयास पडत नाहींत .
९ ).  🌺 छायानिधिगुरुः छायानिधि या नांवाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो . त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो . त्याप्रमाणें ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपति होतो .
१० ). 🌺 नादनिधिगुरुः नादनिधि नांवाचा मणि आहे . ज्या धातूचा घ्वनि त्याच्या कानांत पडतो त्या सर्व धातू स्वस्थानीं सुवर्ण बनतात . त्याप्रमाणें मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानीं पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होतें .
११ ).  🌺 क्रौंचपक्षीगुरुः क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा घेण्यासाठीं सहासहा महिने दूरदेशीं फिरावयास जाते . व बारंबार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते . त्या योगानें तेथें पिलें पुष्ट होतात . त्याचप्रमाणें हा गुरु ज्यांची आठवण करितो ते आपापल्या स्थानीं असतांच तरून जातात .
१२ ).  🌺सूर्यकांतगुरुः सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो . ( सूर्याची इच्छा नसतांनाहीं ) त्याप्रभाणें ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकतेते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं , ग्रंथवाचनानेंच व गुरुप्राप्तीशिवाय जपतपादि साधनें केलीं तर त्यांच्या विशेष उपयोग होणार नाहीं . अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त होणार नाहीं . गुरुतंत्रांत सांगितलें आहे कीं ," शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात् ‌ शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत् ‌ गुरुं " श्रीसमर्थ रामदासस्वामींनीं नवविधा भक्तीचें वर्णन करितांना अर्चन व पादसेवन गुरूचेंच करावें असें सांगितलें आहे . त्याचें रहस्य हेंच होय
मी सगळं ऐकून  विचार करू लागलो
मी काही बोलणार तेवढ्यात स्वामी म्हणाले झोप आता बाकी उद्या बघू
क्रमश:---
खरंच   ज्ञान  किती आघाद  आहे पूर्ण परिक्रमेत स्वामी अजून काय काय सांगणार खरंच मी भाग्यवान आहे
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय। गुरुदेव  💐
              🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--- भाग  ५५
आज स्वामींना मी चित्त ह्या विषयी विचारले स्वामींनी सांगण्यास सुरवात केली
जे साधक नियमित व पुरेसा शास्त्रोक्त योगाभ्यास करतात, त्यांना थोडे दिवस अध्यात्मिक साधना केल्यावर, आपली अध्यात्मिक प्रगती नेमकी किती झाली, हे पहावेसे वाटते. आपली अध्यात्मिक प्रगती मोजायचे साधन म्हणजे आपले चित्त. योगसाधना करून आपले चित्त किती शांत, पवित्र आणि शुध्द झाले आहे, त्यावरून आपली अध्यात्मिक स्थिती मोजली जाते किंवा समजते. नियमित योगसाधनेनुसार आपण अध्यात्मिक प्रगतीच्या कोणत्या पायरीवर आहोत, ते समजण्यासाठी पुढे अध्यात्मिक प्रगतीच्या काही पायऱ्या दिल्या आहेत. त्यावरून आपण आपली अध्यात्मिक स्थिती जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या चित्ताचे प्रामाणिकपणे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे.
🌺१) दुषित चित्त –  दुषित चित्त हि चित्ताची बेसिक स्टेज, सगळ्यात खालची पायरी आहे. ह्या स्थितीत साधक नेहमी दुसऱ्याचे दोष शोधत असतो. नेहमी दुसऱ्याचे वाईट कसे करता येईल याचाच विचार करत असतो. दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहून त्याला, त्यांची नेहमी असुया वाटत असते. दुसऱ्यांचे नुकसान करण्याचे निरनिराळे उपाय नेहमी शोधत असतो. नकारात्मक विचारांनी, नकारात्मक घटनांनी, नकारात्मक व्यक्तिंनी असे चित्त कायम भरलेले असते.
🌺 २) भूतकाळात हरवलेले चित्त – ह्या प्रकारचे चित्त नेहमी भूतकाळात हरवलेले असते. भूतकाळातल्या प्रसंग, घटना आणि व्यक्तिंमधे कायम गुरफटलेले असते. त्याला भूतकाळातल्या घटनांमधे रमायची इतकी सवय झालेली असते की, त्यातच त्याला आनंद मिळत असतो.

🌺३) निराशावादी चित्त – हे चित्त नेहमी निराशेनी भरलेले असते. नेहमी काहीतरी वाईटच घडेल, असे त्याला सतत वाटत असते. सतत भूतकाळाचे विचार करीत राहिल्याने असे होते. सतत भूतकाळातले वाईट विचार करत राहिल्यानेच अशा व्यक्तीचा वर्तमानकाळ ही खराब होतो, निराशावादी होतो.
🌺४) सामान्य चित्त – हि चित्ताची बेसिक, एक सामान्य स्थिती आहे. ह्या चित्तात चांगले – वाईट दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. जेंव्हा अशी व्यक्ति चांगल्या संगतीत असते, तेव्हा तिचे विचार चांगले असतात, आणि जेव्हा वाईट संगतीत असते, तेव्हा तिचे विचार वाईट असतात. ह्या प्रकारच्या चित्ताचे म्हणजेच अशा प्रकारच्या चित्ताच्या व्यक्तींचे स्वत:चे काही विचार नसतात. जशी संगत मिळते, तसे ह्यांचे विचार बदलतात, बनतात. प्रत्यक्षात सध्याचे समाजातील वैचारिक प्रदूषण बघता, सामान्य चित्ताचे लोक जास्त करून नकारात्मक विचारांच्या लोकांच्या प्रभावाखाली असतात.
🌺५) निर्विचार चित्त – काही वर्ष ध्यानयोग, साधना केल्यावर साधक निर्विचार स्थितीला पोहोचू शकतो. ह्या स्थितीत त्याच्या मनात चांगले किंवा वाईट असे कुठलेच विचार येत नाहीत. वर्तमानातल्या काही चांगल्या वाईट परिस्थितीमुळे त्याचे चित्त क्षणभर विचलित झाले तरी, असे क्षणभरासाठीच होते. जसे पावसाळ्यातील पाण्याचा बुडबुडा, एक क्षणभरच राहतो आणि क्षणात फुटून जातो, तसे एका क्षणात हे चित्त जाग्यावर येते. हि अध्यात्मिक स्थितीची पहिली पायरी आहे. असे काही वर्ष ह्या स्थितीत चित्त रहायला शिकले की, असे चित्त सशक्त व्हायला लागते.
🌺 ६)  दुर्भावनारहित चित्त – सशक्त चित्त हळूहळू, पुढेपुढे निर्मळ व्हायला लागते. ते इतके निर्मळ आणि पवित्र होते की, कुणीही  त्याच्याशी वाईट वागले तरी, कुणाहीबद्दल त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत. हि चित्ताची एक चांगली स्थिती मानली आहे.
🌺७)सद्भावनायुक्त चित्त – खूपच थोड्या लोकांना असे चित्त प्राप्त होते. अशा लोकांच्या मनात सर्व विश्वाच्या प्रती कायम सद्भावनाच भरलेल्या असतात. अशा व्यक्तिंना आपण संत म्हणतो. ते सदैव सगळ्यांचे कल्याणच चिंतत असतात. हे सदैव स्वत:तच मश्गुल असतात. ह्यांचे चित्त कुठेही भरकटत नाही, तर सतत साधनेमधे लीन असते.
   मी ऐकण्यात खुप मग्न होतो
लेखक श्री विश्वास वाड


💐   जय  गुरुदेव  💐
                 🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश:--- भाग ५६
परवा आम्ही  योगांनन्द आश्रमात मुक्कामास होतो नंतर तेथून  आम्ही काळ रामानंद  आश्रमात मुक्कामास आलो
      सर्व परिक्रमा अतिशय आनंदात व खरोखर आध्यात्मिक उच्च पातळी कडे जात आहे कारण सर्व विसरलो होतो फक्त स्नान संध्या साधना पूजा करावी दिवसभर अजपाजप करावा  स्वामी रोज रात्री ज्ञानामृत पाजतात ते श्रवण भक्तीने प्राशन करावे रोज उठल्यावर आज स्वामी काय सांगतील याची उत्कंठा लागावी खरं सांगतो एक वेगळ्याच विश्वात असल्यासारखे जाणवत  होते
      माझ्या  मध्ये सुद्धा बदल होतोय हे जाणवत  होते  कशामुळे होतोय हे मात्र कळत नव्हते कारण अनेक आहेत मैय्या परिक्रमेमुळे का नागाच्यासाधनेमुळे का स्वामीच्या संगतीने का माझ्या एकाग्र रीतीने होत असलेल्या साधनेमुळे नक्की काहीच समजत नव्हते पण एक नक्की कि माझी आध्यात्मिक प्रगती होत होती  व विरक्ती येत होती अरे हे मी काय लिहतोय हि तर माझी मी स्तुती करतोय हे योग्य नाही असो
नित्यनियमाने  चालत चालत  कुंभेश्वर येथे आलो स्वामिनीं येथें मुक्कामास  थांबायचे ठरवले
ह्या ठिकाणी शनीने साधना केली असे म्हणतात ह्या ठिकाणी शनीचे मंदिर आहे ह्याला नानी मोटी पनौती असं सुद्धा म्हणतात जेव्हा छोटी साडेसाती येते तेव्हा येथे दर्शनास येतात ह्या ठिकाणी अमावास्येस खूप गर्दी असते  आम्ही शनी मंदिराच्या बाहेरओट्यावर राहण्याचे ठरवले
संध्याकाळी  स्वामीच्या  सांगण्यावरून  तेथील  पाच घरी शुष्क भिक्षा घेतली तेथेच  तेथील एका दुकांदाराकडून  भांडी  घेऊन स्वामी करता स्वयंपाक केला डाळ भात चपाती बनवले नंतर स्नान पूजा साधना झाल्यावर स्वामींना भोजन वाढले  नंतर त्या दुकांदाराकडून दूध घेऊन मी दूध चपाती खाल्ली नंतर भाडी घासून दुकांनदारास  दिली सर्व आवरून स्वामींसमोर बसलो
स्वामी म्हणाले आपण काळ चित्ताविषयी  बोलत होतो आपण काल सात चित्ताबद्दल  बघितले आज पुढे बघू
८) शून्य चित्त – हि चित्ताची सर्वोत्तम दशा आहे. ह्या स्थितीत चित्ताला एक शून्य अवस्था प्राप्त होते. हे चित्त नळीसारखे असते, ज्यातून सतत परमेश्वराचे चैतन्य वहात असते. ह्या चित्तातून देवाची करुणा सतत वर्षाव करत असते. हे चित्त कल्याणकारी असते. ह्या चित्ताची कुणावर कृपा झाली तर त्याचे कल्याणच होते. ह्या चित्तातून कल्याणकारी शक्ती सतत वहात असतात. हे चित्त जो संकल्प करते, तो निश्चित पूर्ण होतो. हे चित्त सतत सगळ्यांच्या चांगल्याचीच इच्छा करते. ह्या चित्तातून सदैव सगळ्या जगाला मंगल आशीर्वाद मिळत राहतो.
आता आपण स्वत:च्या चित्ताचे निरीक्षण करून, समजून घेऊयात, की आपली अध्यात्मिक स्थिती नेमकी कशी आहे. आत्म्याच्या पवित्रतेचा आणि चित्ताचा खूप जवळचा संबंध असतो. असे समजा की, हे चित्तरुपी धन घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. जीवनभर चित्त दूषित करणाऱ्या लोकांमध्ये राहूनही आपल्याला आपले चित्त दूषित होऊ द्यायचे नाही. अशा लोकांच्या सानिध्यात राहूनही, हे चित्तरुपी धन आपल्याला सांभाळून ठेवायचे आहे.
तू  आता झोप उद्या तुला अनुलोम विलोम, ह्या विषयी सांगेन
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड


💐  जय  गुरुदेव  💐
🌹 क्रमश:--भाग ५७
नित्यनियमाने  पहाटे  उठलो ध्यान स्नान संध्या साधना पूजा झाली नंतर कुंभेश्वर येथून  जवळ  असलेल्या रामेश्वर येथे दर्शन घेऊन पुढे निघालो नंतर  मोरली नदीचा संगम जेथे आहे तेथील   हनुमातेश्वर येथे दुपारी पोहचलो तेथे दुपारी थांबलो  स्वामीनीं जेवायचे नाही ठरवले म्हणून साधना आटोपून थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो
पुढे नरखेडी येथील किनाऱ्यावर असलेल्या महादेव मंदिरात मुक्कामास राहायचे ठरवले  आजू बाजूच्या घरातून भिक्षवृत्तीने  आता व डाळ मिळाली स्वामींकरता  डाळ चपाती बनवली नंतर संध्याकाळी स्नान  साधना पूजा झाली  नंतर स्वामीचे भोजन केले नंतर मी चपाती  पाण्याबरोबर  खाल्ली  सगळं  आवरून  स्वामी समोर बसलो
म  स्वामीनीं  बोलण्यास सुरवात  केलि  स्वामी म्हणाले  आज तुला  अनुलोम  विलोम ह्या  बद्दल सांगतो
“अनुलोम विलोम” प्राणायाम, हा प्राणायाम शास्त्रोक्त रित्या कसा करतात व त्याचे नेमके फायदे काय काय आहेत ते आज सविस्तर सांगणार आहे.
या प्राणायामामधे गडोळे बंद करून, सरळ, स्थिर बसून अथवा पाठीचा त्रास असेल तर, प्रसंगी टेकून किंवा झोपून, उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने मोठा म्हणजे दिर्घ श्वास घ्यावा, व डावी नाकपुडी मधल्या दोन बोटाने बंद करून, उजवीने श्वास पूर्ण सोडावा, सोडून झाल्यानंतर त्याच बाजूने दीर्घ श्वास घेऊन, उजवी नाकपुडी पुन्हा अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने सोडावा. श्वास घेताना शांतपणे, मोठा आवाज न करता खोल घ्यावा व श्वास सोडताना तसाच शांतपणे सोडावा. अनुलोम विलोममधील या श्वासांच्या क्रिया करताना डोळे बंद ठेऊन, लक्ष श्वासांवर देऊन क्रिया करणे जरुरीचे असते. तरच आवश्यक फायदे मिळतात.
अनुलोम विलोम प्राणायामद्वारे शारीरिक आजार दूर करण्यासाठी 4 ते ५ सेकंद श्वास घ्यायला, तसेच 4 ते ५ सेकंद श्वास सोडायला लागायला हवा. तसेच मानसीन शांतीसाठी, एकाग्रतेसाठी, ब्लडप्रेशर सामान्य होण्यासाठी, ६ ते ९ सेकंद श्वास घ्यायला व ६ ते ९ सेकंद श्वास सोडायला हवा.
सुरुवातीला सलग 20 मिनिटे व सरावानंतर 30 मिनिटे हा प्राणायाम केला पाहिजे. काही परिस्थितीत सकाळी व संध्याकाळी किंवा दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा, आवश्यकतेनुसार हा प्राणायाम करावा लागतो.  

याचे फायदे - प्रत्येक व्यक्तिची एकावेळेला डावी अथवा उजवी नाकपुडी जास्तीजास्त चालत असते. ज्याची ज्या बाजूची नाकपुडी जास्त चालते, त्याच्या विरुध्द बाजूच्या मेंदूचा विकास यामुळे झालेला असतो. एकाच बाजूच्या मेंदूच्या विकासामुळे त्याच्या शरीराचे नियंत्रण अविकसित राहिलेले असते. अनुलोम विलोम प्राणायाम करू लागल्यामुळे त्याची डावी व उजवी अशा दोन्ही नाकपुड्यांचा श्वास घेण्या सोडण्यासाठी समान वापर केला जातो. यामुळे डाव्या व उजव्या दोन्ही मेंदूंना एकसारखा व पुरेसा प्राणवायू बराचवेळ मिळू लागल्यामुळे दोन्ही मेंदूंचा विकास, पोषण  होते. दोन्ही मेंदूंचे पोषण झाल्यामुळे त्यांचे अविकसित रहिलेले कार्य सुधारते. ऑटोनॉमिक सिस्टीम - शरिरातील ऑटोमॅटिक कार्य करणारी सिस्टीम - जसे खाल्लेले अन्न पचवणे, नवीन रक्त बनवणे, हाडे बळकट करणे, मसल्स स्ट्रॉंग बनवणे, मांस, त्वचा, चरबी बनवणे, अन्न पचवणे, पाठोपाठ एक श्वास घेणे, सोडणे, रक्त पंप करणे, हार्मोन्स, एन्झाइम्स वेळोवेळी पाझरवणे, प्रसंगानुरूप विचार करणे अशा अनेक क्रिया ज्या सिस्टीमद्वारे होत असतात, त्यामधे नियमितता येते, सुसूत्रता येते, डिसिप्लीन येते. म्हणजे ऑटोनॉमिक सिस्टीम बॅलंस किंवा अपडेट होऊन काम करू लागते. यास्तव पुरेसा व नियमित अनुलोम विलोम करणाऱ्यांचे आरोग्य ताबडतोब सुधारते.
डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला व उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. श्वास म्हणजे प्राणवायू, प्राणशक्ती. आपल्या शरिरात घेतलेला ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्तातील तांबड्या पेशी करत असतात. अनुलोम विलोम करताना प्रत्येक वेळी मोठा श्वास घेतल्यामुळे रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण नेहमी पेक्षा 10 ते 15 पट वाढते, रक्तवाहिन्यांचा विकास होतो. त्याच बरोबर नसनाड्यांचाही विकास होतो. रक्त फक्त ऑक्सिजनलाच वाहून नेते असे नव्हे, तर इतर पोषक तत्व जसे प्रोटीन्स, व्हीटॅमीन्स, सॉल्ट्स, न्युट्रीयंट्स यांना ही वाहून नेत असते. ती सर्व ऑक्सिजनबरोबरच शरिराला वेळच्या वेळी मिळू लागल्यामुळे, शरिरामधील सर्व अवयवांची उत्तम वाढ, विकास व पोषण होते. त्यामुळे शरीर बलवान, कार्यक्षम होते. आपल्या शरिरातील ऑर्गन सेल्संना म्हणजेच अवयवांना तसेच मेंदूला पोषक तत्वांबरोबरच ऑक्सिजनची जास्त गरज असते. जेंव्हा अनुलोम विलोममुळे नियमित व पुरेसा ऑक्सिजन मिळू लागतो, तेंव्हा त्या त्या अवयवांमधे दैनंदिन कार्य करण्यासाठी अतिरिक्त उर्जा तयार होते. त्यामुळे अनुलोम विलोम केल्यानंतर पुढील चोवीस तास प्रत्येक अवयव पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतो.
अनुलोम विलोमचा प्रभाव जसा शरिरावर पडतो तसाच मेंदूवरही पडतो. जसा शरिराला पुरेसा प्राणवायू आवश्यक असतो, तसाच मेंदूलाही हवा असतो. अनुलोम विलोम शरीराबरोबरच मेंदूचा ही विकास करून त्याला समतोल बनवतो. अनुलोम विलोममुळे मेंदू रिलॅक्स होतो, शांत होतो. शांत झालेला मेंदू, रिलॅक्स झालेला मेंदू नव्या जोमाने काम करण्यास सिद्ध होतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते, आकलनशक्ती वाढते. विचार शांत होतात, मन शांत होते. मंदबुद्धी असणाऱ्या मुलांनाही या प्राणायामाचा खूप फायदा होतो.  
शरिरातील कोणत्याही रक्तवाहिनीमधे अडथळे, ब्लॉकेज निर्माण झाले असतील तर ते अनुलोम विलोममुळे हमखास उघडले जातात.
अनुलोम विलोममुळे मसल्स मजबूत व हाडे बळकट होतात. अनुलोम विलोममुळे उष्णता कमी होते. पॅरॅलिसीस, अर्धांगवायूचा आजार बरा होतो.
 अनुलोम विलोममुळे शरिरातील रीजनरेशनचा रेट, स्पीड वाढतो. त्यामुळे येणारे अथवा आलेले म्हातारपण, बरेचवर्ष दूर ठेवता येते.
खोलात जाऊन अभ्यास केला तर असे दिसते की अनुलोम विलोम शरिराबरोबरच मन, भावना, विचार, मेमरी, निर्णय क्षमता या सर्वांना करेक्ट करतो. या सर्वांची कार्यक्षमता वाढवतो.
परमेश्वराने मनुष्याला श्वास घेण्यासाठी  दोन नाकपुड्या दिल्या आहेत याला निश्चितच अर्थ आहे. डावा स्वर चंद्र स्वर, याला  “इडा” व उजवा सूर्य स्वर याला “पिंगला” नाडी म्हणतात. डाव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात शीतलता, थंडावा उत्पन्न करतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात उष्णता, उर्जा उत्पन्न करतो. डाव्या स्वराने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला मिळत असतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. अनुलोम विलोम मुळे दोन्ही मेंदूंचा समान विकास होतो. त्यामुळे दोन्ही मेंदूंचे कार्य सुनियोजित रीतीने, सुरळीत होऊ लागते.
    प्रत्येक व्यक्तिमधे डावी अथवा उजवी नाकपुडी जास्त चालत असते. ज्यांची डावी नाकपुडी जास्त चालते त्या व्यक्ती शांत, मनमिळावू, समंजस स्वभावाच्या तसेच सर्दीचे, थंडीचे आजार असणाऱ्या असतात. ज्यांची उजवी नाकपुडी जास्त चालते त्या रागीट, तापट, कार्यक्षम तसेच पित्ताचे त्रास, उष्णतेचे त्रास  असणाऱ्या असतात. काही लोकांचे स्वभाव विध्वंसक असतात तर काहींचे स्वभाव कंस्ट्रक्टीव्ह असतात. सामान्यत: स्त्रियांमध्ये डावी, तर पुरुषांमध्ये उजवी नाकपुडी जास्त वापरली जाते. त्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त समंजस, शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. अनुलोम विलोम व्यक्तीचे स्वभाव, दोष, विचारही बदलतो.
असा हा अनुलोम विलोम प्राणायाम सर्वांना रोज, नियमित व पुरेसा करायला काय हरकत आहे ? नियमित थोडा वेळ अनुलोम विलोमसाठी दिला तर किती तरी फायदे, सहज आपल्या पदरात पडतात....
   चल  झोप आता उद्या  नवीन  विषयावर  बोलू
क्रमश:----
आता  प्रश्न  पडला स्वामी उद्यापासून काय  बोलतील ह्या विचारातच झोप लागली
लेखक श्री विश्वास वाड











चित्ताचे स्तर
जे साधक नियमित व पुरेसा शास्त्रोक्त योगाभ्यास करतात, त्यांना थोडे दिवस अध्यात्मिक साधना केल्यावर, आपली अध्यात्मिक प्रगती नेमकी किती झाली, हे पहावेसे वाटते. आपली अध्यात्मिक प्रगती मोजायचे साधन म्हणजे आपले चित्त. योगसाधना करून आपले चित्त किती शांत, पवित्र आणि शुध्द झाले आहे, त्यावरून आपली अध्यात्मिक स्थिती मोजली जाते किंवा समजते. नियमित योगसाधनेनुसार आपण अध्यात्मिक प्रगतीच्या कोणत्या पायरीवर आहोत, ते समजण्यासाठी पुढे अध्यात्मिक प्रगतीच्या काही पायऱ्या दिल्या आहेत. त्यावरून आपण आपली अध्यात्मिक स्थिती जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या चित्ताचे प्रामाणिकपणे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे.

1. दुषित चित्त –  दुषित चित्त हि चित्ताची बेसिक स्टेज, सगळ्यात खालची पायरी आहे. ह्या स्थितीत साधक नेहमी दुसऱ्याचे दोष शोधत असतो. नेहमी दुसऱ्याचे वाईट कसे करता येईल याचाच विचार करत असतो. दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहून त्याला, त्यांची नेहमी असुया वाटत असते. दुसऱ्यांचे नुकसान करण्याचे निरनिराळे उपाय नेहमी शोधत असतो. नकारात्मक विचारांनी, नकारात्मक घटनांनी, नकारात्मक व्यक्तिंनी असे चित्त कायम भरलेले असते.
2. भूतकाळात हरवलेले चित्त – ह्या प्रकारचे चित्त नेहमी भूतकाळात हरवलेले असते. भूतकाळातल्या प्रसंग, घटना आणि व्यक्तिंमधे कायम गुरफटलेले असते. त्याला भूतकाळातल्या घटनांमधे रमायची इतकी सवय झालेली असते की, त्यातच त्याला आनंद मिळत असतो.
3. निराशावादी चित्त – हे चित्त नेहमी निराशेनी भरलेले असते. नेहमी काहीतरी वाईटच घडेल, असे त्याला सतत वाटत असते. सतत भूतकाळाचे विचार करीत राहिल्याने असे होते. सतत भूतकाळातले वाईट विचार करत राहिल्यानेच अशा व्यक्तीचा वर्तमानकाळ ही खराब होतो, निराशावादी होतो.
4. सामान्य चित्त – हि चित्ताची बेसिक, एक सामान्य स्थिती आहे. ह्या चित्तात चांगले – वाईट दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. जेंव्हा अशी व्यक्ति चांगल्या संगतीत असते, तेव्हा तिचे विचार चांगले असतात, आणि जेव्हा वाईट संगतीत असते, तेव्हा तिचे विचार वाईट असतात. ह्या प्रकारच्या चित्ताचे म्हणजेच अशा प्रकारच्या चित्ताच्या व्यक्तींचे स्वत:चे काही विचार नसतात. जशी संगत मिळते, तसे ह्यांचे विचार बदलतात, बनतात. प्रत्यक्षात सध्याचे समाजातील वैचारिक प्रदूषण बघता, सामान्य चित्ताचे लोक जास्त करून नकारात्मक विचारांच्या लोकांच्या प्रभावाखाली असतात.
5. निर्विचार चित्त – काही वर्ष ध्यानयोग, साधना केल्यावर साधक निर्विचार स्थितीला पोहोचू शकतो. ह्या स्थितीत त्याच्या मनात चांगले किंवा वाईट असे कुठलेच विचार येत नाहीत. वर्तमानातल्या काही चांगल्या वाईट परिस्थितीमुळे त्याचे चित्त क्षणभर विचलित झाले तरी, असे क्षणभरासाठीच होते. जसे पावसाळ्यातील पाण्याचा बुडबुडा, एक क्षणभरच राहतो आणि क्षणात फुटून जातो, तसे एका क्षणात हे चित्त जाग्यावर येते. हि अध्यात्मिक स्थितीची पहिली पायरी आहे. असे काही वर्ष ह्या स्थितीत चित्त रहायला शिकले की, असे चित्त सशक्त व्हायला लागते.
6. दुर्भावनारहित चित्त – सशक्त चित्त हळूहळू, पुढेपुढे निर्मळ व्हायला लागते. ते इतके निर्मळ आणि पवित्र होते की, कुणीही  त्याच्याशी वाईट वागले तरी, कुणाहीबद्दल त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत. हि चित्ताची एक चांगली स्थिती मानली आहे.
7.  सद्भावनायुक्त चित्त – खूपच थोड्या लोकांना असे चित्त प्राप्त होते. अशा लोकांच्या मनात सर्व विश्वाच्या प्रती कायम सद्भावनाच भरलेल्या असतात. अशा व्यक्तिंना आपण संत म्हणतो. ते सदैव सगळ्यांचे कल्याणच चिंतत असतात. हे सदैव स्वत:तच मश्गुल असतात. ह्यांचे चित्त कुठेही भरकटत नाही, तर सतत साधनेमधे लीन असते.
8. शून्य चित्त – हि चित्ताची सर्वोत्तम दशा आहे. ह्या स्थितीत चित्ताला एक शून्य अवस्था प्राप्त होते. हे चित्त नळीसारखे असते, ज्यातून सतत परमेश्वराचे चैतन्य वहात असते. ह्या चित्तातून देवाची करुणा सतत वर्षाव करत असते. हे चित्त कल्याणकारी असते. ह्या चित्ताची कुणावर कृपा झाली तर त्याचे कल्याणच होते. ह्या चित्तातून कल्याणकारी शक्ती सतत वहात असतात. हे चित्त जो संकल्प करते, तो निश्चित पूर्ण होतो. हे चित्त सतत सगळ्यांच्या चांगल्याचीच इच्छा करते. ह्या चित्तातून सदैव सगळ्या जगाला मंगल आशीर्वाद मिळत राहतो.
आता आपण स्वत:च्या चित्ताचे निरीक्षण करून, समजून घेऊयात, की आपली अध्यात्मिक स्थिती नेमकी कशी आहे. आत्म्याच्या पवित्रतेचा आणि चित्ताचा खूप जवळचा संबंध असतो. असे समजा की, हे चित्तरुपी धन घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. जीवनभर चित्त दूषित करणाऱ्या लोकांमध्ये राहूनही आपल्याला आपले चित्त दूषित होऊ द्यायचे नाही. अशा लोकांच्या सानिध्यात राहूनही, हे चित्तरुपी धन आपल्याला

सांभाळून ठेवायचे आहे.

अनुलोम विलोम,
             
आज मी तुम्हाला “अनुलोम विलोम” प्राणायाम, हा प्राणायाम शास्त्रोक्त रित्या कसा करतात व त्याचे नेमके फायदे काय काय आहेत ते आज सविस्तर सांगणार आहे.
या प्राणायामामधे डोळे बंद करून, सरळ, स्थिर बसून अथवा पाठीचा त्रास असेल तर, प्रसंगी टेकून किंवा झोपून, उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने मोठा म्हणजे दिर्घ श्वास घ्यावा, व डावी नाकपुडी मधल्या दोन बोटाने बंद करून, उजवीने श्वास पूर्ण सोडावा, सोडून झाल्यानंतर त्याच बाजूने दीर्घ श्वास घेऊन, उजवी नाकपुडी पुन्हा अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने सोडावा. श्वास घेताना शांतपणे, मोठा आवाज न करता खोल घ्यावा व श्वास सोडताना तसाच शांतपणे सोडावा. अनुलोम विलोममधील या श्वासांच्या क्रिया करताना डोळे बंद ठेऊन, लक्ष श्वासांवर देऊन क्रिया करणे जरुरीचे असते. तरच आवश्यक फायदे मिळतात.
अनुलोम विलोम प्राणायामद्वारे शारीरिक आजार दूर करण्यासाठी 4 ते ५ सेकंद श्वास घ्यायला, तसेच 4 ते ५ सेकंद श्वास सोडायला लागायला हवा. तसेच मानसीन शांतीसाठी, एकाग्रतेसाठी, ब्लडप्रेशर सामान्य होण्यासाठी, ६ ते ९ सेकंद श्वास घ्यायला व ६ ते ९ सेकंद श्वास सोडायला हवा.
सुरुवातीला सलग 20 मिनिटे व सरावानंतर 30 मिनिटे हा प्राणायाम केला पाहिजे. काही परिस्थितीत सकाळी व संध्याकाळी किंवा दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा, आवश्यकतेनुसार हा प्राणायाम करावा लागतो.  

याचे फायदे - प्रत्येक व्यक्तिची एकावेळेला डावी अथवा उजवी नाकपुडी जास्तीजास्त चालत असते. ज्याची ज्या बाजूची नाकपुडी जास्त चालते, त्याच्या विरुध्द बाजूच्या मेंदूचा विकास यामुळे झालेला असतो. एकाच बाजूच्या मेंदूच्या विकासामुळे त्याच्या शरीराचे नियंत्रण अविकसित राहिलेले असते. अनुलोम विलोम प्राणायाम करू लागल्यामुळे त्याची डावी व उजवी अशा दोन्ही नाकपुड्यांचा श्वास घेण्या सोडण्यासाठी समान वापर केला जातो. यामुळे डाव्या व उजव्या दोन्ही मेंदूंना एकसारखा व पुरेसा प्राणवायू बराचवेळ मिळू लागल्यामुळे दोन्ही मेंदूंचा विकास, पोषण  होते. दोन्ही मेंदूंचे पोषण झाल्यामुळे त्यांचे अविकसित रहिलेले कार्य सुधारते. ऑटोनॉमिक सिस्टीम - शरिरातील ऑटोमॅटिक कार्य करणारी सिस्टीम - जसे खाल्लेले अन्न पचवणे, नवीन रक्त बनवणे, हाडे बळकट करणे, मसल्स स्ट्रॉंग बनवणे, मांस, त्वचा, चरबी बनवणे, अन्न पचवणे, पाठोपाठ एक श्वास घेणे, सोडणे, रक्त पंप करणे, हार्मोन्स, एन्झाइम्स वेळोवेळी पाझरवणे, प्रसंगानुरूप विचार करणे अशा अनेक क्रिया ज्या सिस्टीमद्वारे होत असतात, त्यामधे नियमितता येते, सुसूत्रता येते, डिसिप्लीन येते. म्हणजे ऑटोनॉमिक सिस्टीम बॅलंस किंवा अपडेट होऊन काम करू लागते. यास्तव पुरेसा व नियमित अनुलोम विलोम करणाऱ्यांचे आरोग्य ताबडतोब सुधारते.
डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला व उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. श्वास म्हणजे प्राणवायू, प्राणशक्ती. आपल्या शरिरात घेतलेला ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्तातील तांबड्या पेशी करत असतात. अनुलोम विलोम करताना प्रत्येक वेळी मोठा श्वास घेतल्यामुळे रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण नेहमी पेक्षा 10 ते 15 पट वाढते, रक्तवाहिन्यांचा विकास होतो. त्याच बरोबर नसनाड्यांचाही विकास होतो. रक्त फक्त ऑक्सिजनलाच वाहून नेते असे नव्हे, तर इतर पोषक तत्व जसे प्रोटीन्स, व्हीटॅमीन्स, सॉल्ट्स, न्युट्रीयंट्स यांना ही वाहून नेत असते. ती सर्व ऑक्सिजनबरोबरच शरिराला वेळच्या वेळी मिळू लागल्यामुळे, शरिरामधील सर्व अवयवांची उत्तम वाढ, विकास व पोषण होते. त्यामुळे शरीर बलवान, कार्यक्षम होते. आपल्या शरिरातील ऑर्गन सेल्संना म्हणजेच अवयवांना तसेच मेंदूला पोषक तत्वांबरोबरच ऑक्सिजनची जास्त गरज असते. जेंव्हा अनुलोम विलोममुळे नियमित व पुरेसा ऑक्सिजन मिळू लागतो, तेंव्हा त्या त्या अवयवांमधे दैनंदिन कार्य करण्यासाठी अतिरिक्त उर्जा तयार होते. त्यामुळे अनुलोम विलोम केल्यानंतर पुढील चोवीस तास प्रत्येक अवयव पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतो.
अनुलोम विलोमचा प्रभाव जसा शरिरावर पडतो तसाच मेंदूवरही पडतो. जसा शरिराला पुरेसा प्राणवायू आवश्यक असतो, तसाच मेंदूलाही हवा असतो. अनुलोम विलोम शरीराबरोबरच मेंदूचा ही विकास करून त्याला समतोल बनवतो. अनुलोम विलोममुळे मेंदू रिलॅक्स होतो, शांत होतो. शांत झालेला मेंदू, रिलॅक्स झालेला मेंदू नव्या जोमाने काम करण्यास सिद्ध होतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते, आकलनशक्ती वाढते. विचार शांत होतात, मन शांत होते. मंदबुद्धी असणाऱ्या मुलांनाही या प्राणायामाचा खूप फायदा होतो.  
शरिरातील कोणत्याही रक्तवाहिनीमधे अडथळे, ब्लॉकेज निर्माण झाले असतील तर ते अनुलोम विलोममुळे हमखास उघडले जातात.
अनुलोम विलोममुळे मसल्स मजबूत व व हाडे बळकट होतात. अनुलोम विलोममुळे उष्णता कमी होते. पॅरॅलिसीस, अर्धांगवायूचा आजार बरा होतो.
 अनुलोम विलोममुळे शरिरातील रीजनरेशनचा रेट, स्पीड वाढतो. त्यामुळे येणारे अथवा आलेले म्हातारपण, बरेचवर्ष दूर ठेवता येते.
खोलात जाऊन अभ्यास केला तर असे दिसते की अनुलोम विलोम शरिराबरोबरच मन, भावना, विचार, मेमरी, निर्णय क्षमता या सर्वांना करेक्ट करतो. या सर्वांची कार्यक्षमता वाढवतो.
परमेश्वराने मनुष्याला श्वास घेण्यासाठी  दोन नाकपुड्या दिल्या आहेत याला निश्चितच अर्थ आहे. डावा स्वर चंद्र स्वर, याला  “इडा” व उजवा सूर्य स्वर याला “पिंगला” नाडी म्हणतात. डाव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात शीतलता, थंडावा उत्पन्न करतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात उष्णता, उर्जा उत्पन्न करतो. डाव्या स्वराने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला मिळत असतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. अनुलोम विलोम मुळे दोन्ही मेंदूंचा समान विकास होतो. त्यामुळे दोन्ही मेंदूंचे कार्य सुनियोजित रीतीने, सुरळीत होऊ लागते.
    प्रत्येक व्यक्तिमधे डावी अथवा उजवी नाकपुडी जास्त चालत असते. ज्यांची डावी नाकपुडी जास्त चालते त्या व्यक्ती शांत, मनमिळावू, समंजस स्वभावाच्या तसेच सर्दीचे, थंडीचे आजार असणाऱ्या असतात. ज्यांची उजवी नाकपुडी जास्त चालते त्या रागीट, तापट, कार्यक्षम तसेच पित्ताचे त्रास, उष्णतेचे त्रास  असणाऱ्या असतात. काही लोकांचे स्वभाव विध्वंसक असतात तर काहींचे स्वभाव कंस्ट्रक्टीव्ह असतात. सामान्यत: स्त्रियांमध्ये डावी, तर पुरुषांमध्ये उजवी नाकपुडी जास्त वापरली जाते. त्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त समंजस, शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. अनुलोम विलोम व्यक्तीचे स्वभाव, दोष, विचारही बदलतो.
असा हा अनुलोम विलोम प्राणायाम सर्वांना रोज, नियमित व पुरेसा करायला काय हरकत आहे ? नियमित थोडा वेळ अनुलोम विलोमसाठी दिला तर किती तरी फायदे, सहज आपल्या पदरात पडतात....
लेखक

नर्मदा परिक्रमा भाग 25to42


💐  जय गुरुदेव 💐
क्रमश:--- २५
पहाटे ३.०० वाजता उठलो मुख मार्जन करून ध्यानास बसलो बघा मी किती भाग्यवान आहे परिक्रमेच्या आधी म्हाराजांन बरोबर ध्यानास बसायचो परिक्रमेत स्वामीं बरोबर ध्यानास बसतो असो
     ध्यान झाले बादली घेऊन नर्मदा किनारी जाऊन स्नान संध्या केली नंतर वर येऊन नर्मदा पूजन केले व पुढे निघण्याची तयारी केली सर्व आवरा आवर करून श्री सियाराम  महाराजांना नमस्कार केला त्यांनी मला व स्वामींना चहा दिला चहा घेऊन आम्ही पुढे निघालो मी पुढे व काही अंतरावर पाठीमागे स्वामी मनात अजपा जप  चालू होता  चालता चालता रात्री स्वामी बोलले तए आठवत होत स्वामींची समजवण्याची पद्धत फार वेगळी आहे  भाषा उच्च व उदाहरण अतिशय सोपी चेहऱ्यावर भाव अतिशय शांत व मातृतुल्य भाव  खरोखर  मी भाग्यवान  कि दोन्ही सद्गुरू हे माझ्यावर  मातृवत प्रेम करणारे मिळाले
     चालत चालत आंम्ही ससावड गाव पार करून  लेपा गावाजवळ आलो माध्यानाची  वेळ होती म्हणून एका झाडाखाली थांबलो त्यांनी विचारले भोजन करायचे का मी नाही म्हणालो मला खरं हासू आले होते कारण तेथे जवळ घरे नव्हती  आमच्या जवळ काहीही नव्हते  म जेवणार काय त्यांनी ओळखले व ते हि हसले  मी त्यांना सांगितले स्वामी आपण मृत्यू व आत्मा ह्या विषयी सांगत होतात पण तो विषय  आपला अर्धवटच  राहिला तर कृपा करून आपली इच्छा असल्यास त्यावर बोलावे त्यांनी सांगितले एक लक्षात ठेव दिवसा फक्त चालणे व जप साधना करणे रात्री झोपण्याआगोदर तुझ्या शंका असतील त्यावर व आध्यात्म चर्चा
दोन तास तेथे झाडाखाली विश्राती घेऊन दुपारी पुढे निघालो
नंतर पुढे लेपा गाव आले लेपा गावाच्या पुढे  वेदा नदी मैय्यास मिळाली आहे तिथे वेदा संगम आहे त्या संगम किनाऱ्यावर। शिव मंदिर आहे आम्ही त्या मंदिरात गेलो तेथे कोणीही नव्हते स्वामी म्हणाले आज आपण येथे राहू
  आम्ही शिव मंदिरात राहण्याचे ठरवले येथे काय घडले उद्या बघू
क्रमश
गुरुकृपा काय काय करेल हे खरोखर  आकलन शक्तीच्या पलीकडे आहे आपण फक्त स्थिर होऊन पहाणे

💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--२६
    वेदा संगमावरील शिव मंदिरात आम्ही ४.०० वाजता येऊन पोहचलो तेथे कोणी नव्हते मी स्वामींना म्हणालो इथे कोणीच नाही जवळपास आश्रम किंवा घरे नाहीत आपण दुपारी पण भोजन केले नाही आता पण उपवास का
    स्वामी हसले म्हणाले अरे चिंता का करतोस मैय्यानि इथे काही ठेवले असेल बघ शोध मी मी शोधण्यास सुरवात केली तेव्हा शिव लिंगा मागे एका पिशवीत थोडासा आटा, तांदूळ,डाळ, दोन बटाटे व मीठ दोन मिरच्या होत्या तेथे तवा पण होता
मी ते स्वामींसमोर आणले ह्याच काय करू
स्वामी म्हणाले दगडाची चूल बनव काड्या गोळा करून आन आट्याचे रोडगे करून तव्यावर भाज तुझ्याकडे भांड आहे त्यात डाळ तांदूळ घालून खिचडी सारखं कर दोन्ही बटाटे चुलीत भाज नंतर कुस्करून त्यात मीठ मिरची घाल झाली चटणी सर्व शिध्याच बनव कारण अजून एक माताराम परिक्रमा करतेय ती येईल मला आश्चर्य वाटले ते म्हणाले काळजी नको करू ती फक्त आजची रात्र आपल्याबरोबर असेल उद्या ती तिच्या मार्गाने जाईल तीच आपल्याला बरोबर ठेवणार नाही असो
    स्वामींनी सांगितले तसा सर्व स्वयंपाक केला बघा हळद,तेल,मसाले,काहीही नाही
ह्यालाच म्हणतात भुकेला कोंडा व निजायल धोंडा असं बनवताना माझ्या मनात आले सर्व झाकून ठेवले  स्वामींना सांगितले मी स्नानाला जातो ते म्हणाले मी स्नान करतो मी म्हणालो आपण दोघेही गेल्यावर इथे कोण कुत्रा किंवा मांजर येऊन खाल्ले तर तुम्ही जाऊन या मी नंतर जाईन त म्हणाले नाही तू पण जा अरे खाल्लं तर खाल्लं त्याच्या करता बनवलं असं समज
    थोडस  अनिच्छेने मी निघालो मंदिराच्या खाली उजव्या बाजूस मी तर डाव्या बाजूस ते गेले थोडं पुढे एका दगडावर मी पंचा धोतर व भस्माची डबी ठेवली व पुढे गेलो एका दगडावर बसून तुंब्याने ( कमंडलू ) स्नान केले खुप आरामदायी वाटले तुंबा भरून पाठीमागे आलो आणि जे बघितले त्यांनी माझया तोंडातून शब्दच फुटेना
    कारण माझया पंचावर एक नाग चर पाच वेटोळे घालून फणा काढून बसलेला काय करावे कळेना स्वताला सावरले त्याला नमस्कार केला पुढे जायची हिम्मत होईना  काहीच सुचत नव्हते बरं पंचा व भस्म सोडून जाऊ तर मंदिरात जायला तोच रस्ता  काहीच कळेना काय करावे
   तेवढ्यात बाजूनी एक पांढरी साडी नेसलेली हातात काठी असलेली  व खाद्यांवर झोळी अश्या वेशात एक माताराम आली मला म्हणाली नर्मदे हर महाराज अहो का थांबला केवाचे थांबलाय मी तुकडून येताना बघतेय  मी खुणेने फक्त नाग दाखवला
  ती माताराम हसली म्हणाली परिक्रमा करताय आणि ह्याला घाबरलात अरे हा तर मैय्याचा वडिलांचा लाडका म्हणजे मैय्याचा भाऊ आणि त्याला घाबरलात तरी  माझ्या तोंडातून शब्द निघेना त्यांनी सर्व सामान ठेवले त्या पुढे झाल्या त्यांनी त्याला नमस्कार केला व हातानी पकडून समोरच्या झाडीत सोडला मी पहातच राहिलो त्यांनी माझया तोंडावर पाणी मारले मी भानावर आलो
    माताजींनी विचारले इथे राहण्यासाठी काही आहे का मी म्हणालो तेथे शिव मंदिर आहे आम्ही तेथे उतरलोय त्या म्हणाल्या कोण कोण आहे किती मूर्ती आहे ( मूर्ती हा शब्द इकडे परिक्रमावासीयांना उद्देशून वापरतात ) मी म्हणालो आम्ही दोघेच गुरु शिष्य मी व माझे सद्गुरू
त्या म्हणाल्या ठीक आहे तुम्ही पुढे व्हा मी स्नान व पूजन करून येते
मी मंदिरात आलो स्वामी आधीच आले होते अजूनही मी घाबरलेलाच होतो व त्या मातारामांचे आश्चर्य वाटत होते स्वामींनी ओळखले अरे जे घडायचे ते घडून गेले कितीवेळ भीती राहणार आहे पूजा आरती कर भीती जाईल मी पूजा आरती केली  अष्टक म्हटले
तो पर्यत त्या माताराम आल्या त्यांनी आल्या आल्या नर्मदेहर म्हणून आरोळी दिली सर्व सामान बाजूला ठेवलं शंकरास नमस्कार केला स्वामींजवळ आल्या
माझा परिचय मी परिक्रमावाशी एवढाच देऊ शकते आज संध्याकाळ झाली आहे म्हणून मी इथे थांबते उद्या माझ्या मार्गाने मी जाईन स्वामी फक्त तथास्तु म्हणाले माझया बोलण्याचं प्रश्नच नव्हता
स्वामींनी विचारले भोजन करणार का त्यांनी हो म्हटले आंम्ही तिघे जण जेवलो बघा नंतर मी ती दोन तीन भांडी घासली जेवतानासुद्धा माझ्या डोळ्यासमोरून नागाचा प्रसंग जात नव्हता
मी खरोखर भीतीने गप्प झालो होतो भांडी घासून मी स्वामींसमोर बसलो
माताराम पण होत्या
स्वामी म्हणाले तू घाबरलेला आहेस पण लक्षात घे हे तुझ्या प्रारब्धात होते म्हणून तू तिकडे एकटा गेलास आज मी तुला प्रारब्धा विषयी सांगतो
आणि ते बोलू लागले
क्रमश:--
इथे अजून बरेच काही घडले ते उद्या बघू

💐  जय गुरुदेव 💐
🌹क्रमश:---२७
मी स्वामींच्या समोर बसलो होतो व थोडेसे दूर त्या माताराम बसल्या होत्या त्यांना सर्व ऐकू जात होते व त्यांचे लक्ष सुद्धा इकडेच होते
   स्वामी म्हणाले प्रारब्धावर मी तू ला आधी एक गोस्ट सांगतो नीट एक
    एक महाराज होते ते आयुष्यभर ईश्वर नामसमरण करीत असत कालपरत्वे ते वृद्धवस्थेस पोहचले शरीर क्षीण झाले त्यांना कुठलीही क्रिया करण्यास मदत लागे त्यांच्या शेजारील खोलीत त्यांचे काही शिष्य रहात होते महाराजाना नेईसर्गिक विधी साठी शिषयांना बोलवावे लागे  नंतर नंतर शिष्य कंटाळा करू लागले व यायला उशीर करू लागले
  काही दिवसानंतर त्यांनी विधी करता शिषयांना हाक मारली पहिल्या हाकेतच एक तरुण मुलगा आला त्यानि सर्व सेवा केली असे दोन तीन वेळा घडले एका हाकेतच तो मुलगा येऊन सेवा करू लागला महाराजाना शंका आली इतके दिवस डॉ तीन हाक मारून सुद्धा कोणी येत नव्हते आता हा पहिल्या हाकेतच येतोय हा कोण आहे तेंव्हा त्यांनी त्या मुलाचा हात धरला व विचारले तू कोण रे तेंव्हा त्या मुलाने मूळ स्वरूप प्रगट केले तर ते त्यांचे सद्गुरू होते त्यांनी सद्गुरुंना नमस्कार केला व म्हणाले माझ्या करता आपणास एवढा त्रास
   तेंव्हा ते म्हणाले हे तुझे प्रारब्ध भोग आहे तू भोगतोयस  तेंव्हा महाराज म्हणाले आपली कृपा कमी आहे का कि माझे प्रारब्ध भोग जास्त आहेत की तुमच्या कृपेने संपत नाही तेंव्हा त्यांचे सद्गुरु म्हणाले मी तुझे प्रारब्ध भोग ह्या जन्मात नष्ट करू शकतो पण तू ते भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागेल मला ते नको आहे मला तुला मोक्ष मिळवून द्यायचा आहे म्हणून मी तुला ते भोगण्यास मदत करून शक्ती देत आहे
  त्यांनी सद्गुरुंना विचारले असे कोणते भोग आहेत  तेंव्हा सद्गुरु म्हणाले तीन प्रकारचे भोग असतात नीट एक
🌸 मंद प्रारब्ध भोग
 ईश्वर आराधना सद्गुरू सेवा व जप केल्याने हा भोग नाहीसा होतो
🌸 तीव्र प्रारब्ध भोग
अनेक संतांच्या संगतीने तिर्थाट्टंन केल्याने धर्माचरण दान  केल्याने हा भोग नष्ट होतो
🌸तीव्रत्तम  भोग
हा प्राब्धभोग भोगावाच लागतो
पण सद्गुरुंशी जो साधक एकनिष्ठ असतो त्याला हा भोग भोगण्याकरता सद्गुरु स्वतः त्याच्या बरोबर राहून बोग भोगण्यास साहाय्य करतो जसे मी तुला साहाय्य करतोय हे ऐकल्यावर आपला सद्गुरु आपली सेवा करतोय ते सुद्धा आपले भोग भोगण्या करता त्या महाराजांना भरून आले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले
  स्वामी म्हणाले काही भोग चांगले सुद्धा असतात पण मनुष्याला कळत नाही व तो उगाचच घाबरतो जसे तुला नागाने दर्शन दिले हे चांगले पण तू घाबरलास हे एकूण मला परत तो प्रसंग आठवला व अंग शहारले ते पाहून त्या माताजी हसल्या व स्वामींना  म्हणाल्या अजून तुमच्या शिष्य घाबरलेलाच आहे
   मग त्या माझायजवळ आल्या व म्हणाल्या घाबरू नका मि तुम्हांला मी उद्या नागाची साधना देते जेणे करून तुम्हाला नागाविषयी सर्व ज्ञात होईल मी तुम्हाला गुरुमंत्र देणार नाही फक्त साधना देईन त्याचे नियम पण आहेत ते सांगेन  तुमच्या सद्गुरुनची परवानगी घ्या व सांगा
क्रमश:
उद्या नियम बघू

💐  जय  गुरुदेव  💐
🌹भाग :--- २८
माताजींनी  नियम सांगायला सुरुवात केली साधना जरा कठीण आहे पण साधकाला साधनेत कुठलीही गोष्ट कठीण वाटता कामा नये
🌻 मी जो मंत्र देईन तो रोज सकाळ दुपार व संध्याकाळ  स्नान संध्या करून एक माल जपणे
🌻 हे अनुष्ठान ३१ दिवस करायचे
ह्या ३१ दिवसात तेल ,तिखट ,मीठ, साखर ,भात ,भाजी, वरण, सर्व वर्ज्य फक्त दूध चपाती दुधात साखर व चपातीत मीठ नाही
जेव्हा दूध मिळणार नाही तेव्हा चपाती नुसती किव्हा पाण्याबरोबर ग्रहण करणे चपाती न मिळाल्यास नुसते दूध पिणे दोन्हीही न मिळाल्यास उपवास करणे खूप कठीण होत कारण मी भ्रमणात होतो इथे दूध चपाती मिळेल कि नाही भरवसा नाही कारण इकडे चहा सुद्धा कधी कधी कोरा मिळतो असो
🌻 जपाच्या वेळेस अंगात उष्णता निर्माण होईल घसा शुष्क होईल पण जपमाळ पूर्ण होईपर्यंत पाणी प्यायचे  नाही
असे नियम सांगून त्यांनी दोन्ही सद्गुरुंची परवानगी घेण्यास सांगितले
मी विचार करायला लागलो परिक्रमा सुरु होऊन आजचा पाचवा दिवस पाच दिवसात  अनपेक्षित इतक्या घटना खरोखर मैय्या व सद्गुरुंच्या मनात काय आहे काहीच कळत नाही पण एक नक्की मैय्या  परिक्रमेत वेगवेगळे अनुभव येतात हे प्रत्ययास येऊ लागले असो
मी स्वामींना विचारले साधना घेऊ का ते हसले म्हणाले आरे तू इकडे साधनेसाठीच आला आहेस त्यामुळे ईश्वरी कोणतीही साधना करायला हरकत नाही मग मी ठरवले सकाळी ध्यानात महाराजाचे स्मरण करून त्यांना विचारू त्यांचा नकार असेल तर आपोआप माताजी मंत्र देणार नाहीत असो
नंतर निद्राधीन झालो तर दृष्टांतात महाराज म्हणाले आपल्या सद्गुरुंचे अनुग्रह नियम पाळून अन्य कुठलीही साधना करणे शक्य होत असेल तर जरूर करावी पण कोणतीही साधना अपूर्ण करू नये म्हणजेच साधना सुरु करण्याआधी आपल्याला शक्य आहे का हा  विचार करावा नियम पाळता येतील का ह्या सगळ्याचा विचार करून ठरव  जाग आली तसे महाराजांचे म्हणणे पण बरोबर होते कारण भोजना बद्दल जो नियम होता तो कठीण होता कारण मी परिक्रमेत कधी कुठे असेंन सांगणे कठीण आहे व दुध मिळणं एवढं सोपं नाही पण ह्या पाच दिवसात घडणाऱ्या घटना वरून हे नक्की मैय्या किनारी माझी साधना खुप होईल याची खात्री आली
उठलो स्वामी बरोबर ध्यान करून नंतर स्नानासाठी गेलो कालच्या संध्याकाळचा प्रसंग आठवला पण न भिता गेलो स्नान संध्या केली परत  मंदिरात आल्यावर नर्मदा पूजन अष्टक म्हटले स्वामी म्हणाले शंकराला अभिषेक कर म शंकरास रुद्र अभिषेक केला त्या माताराम सुद्धा अभिषेकास बसून मंत्र म्हणत होत्या नंतर त्यांना सांगितले मला साधना द्या त्यांनीं विचारले नियम पाळाल न तेवढ्यात स्वामी म्हणाले अहो तो माझा शिष्य आहे कितीही कठीण प्रसंग आला तरी जिद्दीने साधना पूर्ण करेल मी खात्री देतो मला खरंच भरून आले कारण गुरूंकडून हि मिळालेली शाबसकीच आहे
त्या मातारामांनी मला एक तांब्याचा नाग दिला सर्व नियम पुन्हा सांगितले व तुमच्या मैय्या बरोबर हा नाग ठेवा व ह्याची पण पूजा करा व ह्याचा समोर जप करा असे म्हणून माझया कडून ३१ दिवसांचा साधनेचा संकल्प सोडून घेतला ३१ दिवसानंतर नाग मैय्यात सोडण्यास सांगितले  व नंतर नागाचा मंत्र दिला व त्या निघून गेल्या म स्वामींनी सांगितले आजपासूनच सुरवात कर आपण उशिरा निघू
म मी नागाची पूजा केली व एकाग्र होऊन जप करण्यास सुरुवात केली जरा वेगळेच वाटत होते असो
जप झाल्यावर आवरा आवर करून निघण्यास १०.०० वाजले
 स्वामी म्हणाले रोज एवढा उशीर चालणार नाही उद्या पासून ध्यान झाले की प्रथम नागाची साधना कर नंतर उजडेल मग संध्या व नर्मदा पूजन कर न मग निघू समजले मी हो म्हटलं म्हणजेच उद्या पासून थंडीचा  विचार न करता ४ ते ४.३० ला स्नान करावे लागणार  हे नक्की अजून  काय काय घडेल काय माहिती पण चिंता नाही कारण माझ्या कडून  सर्व करून घ्यायला तिघे जण आहेत १)महाराज,२)स्वामी ,३ ) मैय्या म मला कसली चिंता खरंच आहे न मी भाग्यवान स्वताच्या मनालाच विचारले
क्रमश:
वेदा संगमवरून निघालो बघू पुढे काय होते ते

लेखक श्री वाड फोन नंबर 9503037638

💐  जय  गुरुदेव  💐
🌹 क्रमश:--- २९
१० वाजता वेदा संगम वरून निघालो नेहमी प्रमाणे मी पुढे व स्वामीजी मागे होते माझ्याकडे माझी पिशवी काठी तुंबा होते आज जरा पिशवी जड लागत होती कारण कळेना स्वामींजवळ काही नव्हते त्यांनी आवाज दिला मी थांबलो त्यांनी विचारले सामान जड आहे का मी म्हंटल थोडं जड वाटतंय ते म्हणाले असं कर तुंबा माझ्याकडे दे मी म्हंटल नको राहू द्या ते म्हणे दे रे नाही हो करता त्यांनी तुंबा घेतला आम्ही पुढे चालत राहिलो
माकडखेडा येथे आलो ते म्हणे दुपारचे आपण इथेच थांबू कारण तुला साधना करायची आहे व इथे शिव मंदिर पण आहे मी पण होकार दिला आम्ही थांबलो
     ह्या परिक्रमेतील  एक महत्वाची गोष्ट  सांगतो  बरेच  परिक्रमावाशी होते जे पुढे जात होते थांबत होते पण फक्त नर्मदे हर या शब्दाव्यतिरिक्त कोणीच कोणाशी गप्पा मारणे किंवा  उगाचच चौकशी करणे असले काहीही नव्हते कारण जो तो आप आपली साधना करण्यात व्यस्त  होते  २०१० नंतर मी पाच परिक्रमा केल्या त्या मध्ये चौकशी व गप्पा इतक्या कि साधनेला वेळच मिळत नाही असो
     आम्ही माकडखेडास थांबलो  म मी तेथे स्नान केले संध्या केली व नंतर नागाची पुजा करून एकाग्र होऊन मातारामांनी दिलेला जप केला
    जप चालू असतांना एक वेगळीच अनुभूती येत होती म्हणजे शरीर एकदम जड जड  वाटायचे मधूनच चक्कर येते का असे  वाटायचे  व आजूबाजूला  सुगधं येत असे व जप झाल्यावर थकवा आल्यासारखे वाटत होते सकाळी पण असेच वाटले
स्वामींना विचारावे असे वाटले पण परत ठरवले  दोनच वेळा जप झालाय अजून एक दोन दिवस जाऊ देऊ मग बघू जप झाला थकवा आल्याने थोडा आडवा झालो झोप लागली
     अचानक जाग आली आणि स्वामी दिसले नाही तसा जरा घाबरलो भराभर सगळं आवरलं आणि निघालो चालण्याचा वेग जेव्हढा होता त्याचा पेक्षा मनाचा वेग जास्त होता स्वामी रागावून तर गेले नाहीतन माझी काय चूक झाली अनेक प्रश्न मनात घर करत होते डोळ्यातून पाणी पण येत होते मैय्या कडे बघून स्वामींना भेटवं अशी प्रार्थना करत होतो मनाची अवस्था फार बिकट झाली होती शब्दात वर्णन करणे कठीण आहे रावेरच्या खडक नदीस ते भेटल्यापासून ते आतापर्यत सर्व डोळ्यासमोर येत होते कुठे आपण चुकलो आठवत होत पण काहीच कळत नव्हते स्वताला खुप दोष देत होतो मी का झोपलो स्वताचा खुप राग येत होता काय करावे कळत नव्हते मनात जप चालू होता पाय भराभर पुढे धावत होते रस्त्याबद्दल कळत नव्हते फक्त ओढीने चालणं काय जवळ जवळ धावतच होतो बडगावला आलो एक जण चहा प्यायला बोलवत होते नम्र नकार दिला व त्याला स्वामींचे वर्णन करून विचारले तो म्हणे हो आत्ताच थोडावेळ झाला ती मूर्ती पुढे गेलीय थोडा जीवात जीव आला म्हणजे स्वामी पुढे आहेत म पुन्हा विचार आला मला भेटतील का मन पण किती विचित्र असते काय काय मनात येईल सांगता येत नाही मनात जप चालू होता व डोळ्यात पाणी चालू होते चालण्याचा वेग वाढवत होतो मनात एकच होते स्वामी आजच भेटावे
क्रमश:--
उद्या बघू काय होते
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
🌹 क्रमश:-- भाग  ३०
बघा  मन किती विचित्र असतं  परिक्रमा सुरु करतांना मी कोणा बरोबर  राहणार नाही आणि आता स्वामी नाही तर मनच स्थिर होत नव्हते असो
     चालत चालत मैय्या किनाऱ्यावरून शालिवाहन  पर्यत आलो आत जाणार तर समोर महादेवापाशी स्वामी बसलेले दिसले खांद्यावरील सामान तसेच टाकून धावत स्वामींपाशी गेलो त्यांच्या पायावर डोकं ठेवले व रडू कोसळले त्या अवस्थेचा फक्त विचार करा त्यांनी उठवले शांत केले म्हणाले तू झोपला होता म तुला कसे उठवणार आणि काय रे गुरूच्या शरीरावर एवढे प्रेम का ? सद्गुरूंला  देहातीत बघायचे नसते  ज्यावेळेस शिष्यास  वाटते सद्गुरू  आपल्या  जवळ नाही म्हणजेच  तो साधनेत कुठेतरी मागे आहे कारण सद्गुरू हे नेहमी मनस्वी साधना करणाऱ्या  साधकाला दिलेल्या मंत्रात म्हणजेच साधकाच्या मनात असतात  म  ते शरीराने दूर असले तरी शिष्याबरोबरच असतात जेव्हा शिष्य  मंत्रापासून दूर असतो तेव्हा सद्गुरू देहाने जरी जवळ असले तरी ते शिष्यापासून दूर असतात म्हणून सांगतो अजपा जप करत रहा म्हणजे  सद्गुरू सदैव जवळ राहतील म  त्यांना शोधायची गरज नाही असो मी म्हणालो तसे नाही स्वामी पण तुम्ही दिसला नाहीत निघून आलात मला वाटले माझे काही चकले का? ह्या विचाराने मी अस्वस्थ होतो कारण परिक्रमेतच नाही भवसागरात गुरु जर रुष्ठ झाले तर त्याला भवसागर पार करणे कठीण असते आणि माझे सर्वस्व सद्गुरू आहेत जसे बालकाची आई त्याचा पासून दूर गेली तर त्या बालकाची  अवस्था न सांगितलेली बरी मी खरं सांगतो स्वामी एकवेळ माझयावर देवता रुष्ठ झाली तर मला चालेल पण माझ्यावर सद्गुरू रुष्ठ झालेत हे मी सहन नाही करू शकणार त्यापेक्षा मी मृत्यू स्विकारींन हे मी त्यांच्या समाधानाकरता नाही बोललो हे खरंच सत्य आहे हे ते जाणत होते त्यांनी माझ्याकडे प्रेमाने बघितले त्यांचे डोळे पण भरून आले असो आंम्ही आज येथेच मुक्काम करायचे ठरवले
   ह्याला शालिवाहन म्हणतात तसे जवळचे गाव नावाडा टोळी आहे पण शककर्ता शालिवाहन इथला म्हणून ह्याला शालिवाहन नाव पडले असं हि म्हणतात की शालीवाहनने येथे तपसाधना केली नक्की माहीत नाही इथे पण शिवमंदिर आहे बघा योग कसा नागाची साधना मिळाल्यापासून  आता तिसऱ्यांदा जप होणार आहे तिन्ही वेळेस शिव मंदिरच भेटले
 आंम्ही शिवमंदिरात राहायचे ठरवले इथेच आश्रम होता स्वामींना विचारले भोजनाचे काय करायचे ते म्हणाले समोरचा आश्रमातले चालेल पण तुला दूध चपाती मिळेल का विचारून ये  मी गेलो तेथिल महाराज  मराठीच होते त्यांना मी साधनेविषयी सांगितले त्यांनी सांगितले काळजी करू नका तुमची व्यवस्था होईल पण पूर्ण परिक्रमेत कस कराल मी म्हटलं ती काळजी सद्गुरुंना असो
    म मी तुंबा व त्यांच्या कडून बादली घेऊन स्नानास गेलो समोरच्या तीरावर मंदिर दिसले काय असेल विचार करत होतो जवळच स्नान करत असलेल्या  महाराजांना विचारले त्यांनी उत्तर दिले ते ऐकून मला माझी चूक कळली
क्रमश:---
उद्या बघू त्यांनी काय  उत्तर दिले
लेखक श्री विश्वास वाड

💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:----३१
    जवळच एक महाराज स्नान करत होते मी त्यांना विचारले समोर कोणते ठिकाण आहे त्यांनी मला विचारले आप यहा क्या कर रहे हो मी म्हटलं परिक्रमा तो म्हणाला तो वो ठीक करो सामने से क्या लेना देना जब वाहा जायएंगे  तब देख लेना यहा आये हो तो साधना करो इधर उधार मत देखो मी गप्प झालो मी बादली भरून आणली व स्नान करू लागलो त्या महाराजांनी जातांना सांगितले वो महेश्वर है फिर कभी इधर उधार मत देखो अपनी साधना ओर अपनी परिक्रमा इतना हि देखो मी स्नान संध्या केली वर आलो शिव मंदिरात शिवलिंगावर तो नाग ठेऊन मातारामांनी दिलेला जप सुरु केला लागोपाठ तीन वेळेस आलेली अनुभूती परत आली
नंतर मैय्या पूजा आरती अष्टक झाले मग स्वामीना नमस्कार केला भोजनाची घंटा झाली स्वामी व मी भोजनास गेलो प्रथम स्वामींचे भोजन झाले त्यांचे ताट घासले मग ते गेल्यावर मी तेथील म्हाराजांनकडून दूध चपाती घेतली नंतर परत शिव मंदिरापाशी आलो स्वामींच्या झोपण्याकरता सतरंजी चादर मागून घेतली स्वामीचे माझे अंथरून लावून स्वामींपाशी आलो आज ते काय सांगतील बघू
त्यांनी सांगितले तुझे सर्व समतोल आहे कारण तुझे प्रारब्ध ,कर्म व बुद्धी याची तू व्यवस्थित सांगड घालतो आहेस
मी म्हणालो मी समजलो नाही तर वेड्या कोणी प्रारब्ध श्रेष्ठ मानत तर कुणी कर्म तर कुणी बुद्धी  श्रेष्ठ मानत पण  वास्तवात  तिन्ही सारखेच आहे  तिन्ही पैकी कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ नाही पण मनुष्य  हा भ्रमाचा पुतळा आहे तो वेळेनुसार  एखाद्याची उच्च निचता ठरवतो मी म्हणालो स्वामी अजून जरा  विस्तृत करा ते हसले म्हणे बघ तू या तिघात काय श्रेष्ठ मानतो मी म्हणालो प्रारब्ध  ते म्हणे कस आतां मला सांग तुझया प्रारब्धात दुसरे सद्गुरू होते नागाची साधना मिळणार होती बरोबर मी म्हणालो हो म  ते म्हणाले पण जर तू परिक्रमेस आलाच  नसता तर  तुला हे मिळाले असते का तर तुला बुद्धी झाली परिक्रमेस  येण्याची मग बुद्धी श्रेष्ठ का तर तुला बुद्धी झाली पण तू परिक्रमेला येण्याचे कर्म  केले नसते तर म कर्म श्रेष्ठ का तर अनेक  जणांनी परिक्रमेस  येण्याचे कर्म केले पण त्यांना हे काहीही मिळाले नाही का तर त्यांच्या प्रारब्धात नव्हते मी प्रारब्ध  श्रेष्ठ  का तर पुन्हा तीच सांगड येईल म नक्की काय आहे तर ज्याची  आपल्या सद्गुरुंवर  निष्ठा नाही साधनेवर विश्वास नाही तो ह्या चक्राचा जास्त विचार करतो
आध्यात्म शास्रात सर्वात जास्त महत्व सद्गुरू व साधना यालाच आहे बाकी सर्व शब्द फसवे आहे त्यांनी ह्यावर बरेच विवेचन दिले मी संक्षिप्त सांगितले
क्रमश:----
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--भाग ३२
स्वामी प्रारब्ध ,कर्म व बुद्धी हयावर बोलत होते मी ऐकत होतो खरोखर स्वामीच्या मुखात सरस्वती आहे आणि सांगण्याचीं पद्धत विलक्षण होती त्यामुळे लक्ष किंचित सुद्धा विचलित होत नाही खरी एकरूपता याला म्हणतात असे मला वाटते असो
    मी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी प्रारब्ध कर्म बुद्धी या विषयी आपण सांगितले जरा ज्योतिष ह्या विषयी सांगाल का
      महाराज हसले म्हणाले खऱ्या साधकाला ज्योतिषाची गरज नसते त्यास फक्त साधना व गुरुनिष्ठा आवश्यक आहे कारण गुरुकृपेने  साधकाचे भविष्य सुद्धा बदलते ह्याचया अनुभव तुझया इतका कोणाला असेल  हे खरं आहे कारण माझे भविष्य फार वेगळे होते व फार वेगळे घडले असो स्वामी म्हणाले तुझी उत्सुकता आहे तर मी सांगतो
     हे बघ ज्योतिष हे एक शास्र आहे ज्योतिशांचे भविष्य खरे ठरते पण त्या ज्योतिषाच्या  मागे दैवी साधना महत्वाची आहे कारण त्यांनी वाणीला तेज येते
  आता बघ तुझ्या जन्म झाला तेव्हा नऊ ग्रह होते व आता ४० वर्षांतर पत्रिकेत अजून तीन ग्रह मांडतात म्हणजे पहिले पत्रिकेत ९ ग्रह मांडायचे आता १२ मांडतात अजून काही वर्षांनी ह्याच्यात सुद्धा वाढ होऊ शकते कारण अवकाश ( आकाश ) खुप विशाल आहे तिथे एकंदर  १६८५ ग्रह आहेत हे अजून कोणालाही माही नाही त्या सगळ्यांचा मानवी जीवनावर फरक पडतोच
आता खुप रात्र झाली आहे तूला लवकर उठायचे आहे मी तुला उद्या कुंडली  सामुद्रिक   ह्या विषयांवर सांगेन गुरु आदेश  विषय चांगला चालवू होता पण त्यांनी थांबवला मी त्यांना  सांगू शकत नव्हतो कि आत्ताच सांगा गुरु आज्ञा मानून मी झोपन्या साठी आडवा झालो विचार करू लागलो बापरे १६८५ ग्रह या सगळ्यांचा  परिणाम  समजण्या पलीकडे आहे सगळं असो बघू उद्या काय ते
क्रमश:---
उद्या बघू ज्योतिष शास्रा विषयक अजून काय स्वामी सांगतील
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय। गुरुदेव  💐
🌹 क्रमश:--भाग ३३
पहाटे तीन वाजता उठलो स्वामींबरोबर ध्यान साधना करून चार वाजता बादली घेऊन मैय्यावर स्नानास गेलो थोडासा अंधार होता पण सद्गुरूंचे स्मरण करून स्नान केले परत शिव मंदिरात येऊन संध्या पूजन व मातारामांनी दिलेली साधना केली आज नागजपाच्या वेळेस खुपच वेगळे वाटत होते अजून नीट काहीच कळत नव्हते असो
    साधना व पूजा हे सगळे झाले त्यावेळेस ६.३० वाजले स्वामी पण स्नान करून आले स्वामींकारता चहा घेऊन आलो मला तर चहा घ्यायचं नव्हता असो
    सात वाजता सर्व आवरून  आम्ही पुढे निघालो अजपाजप चालू होता  दिवसभर  जप करत चालणे सकाळ दुपार संध्याकाळ एकाग्र साधना करणे रात्री स्वामींची अमृत वाणी ऐकणे अतिशय सुंदर दिनक्रम चालू होते हि सर्व सद्गुरू व मैय्याची कृपा  असच सर्व आयुष्य सद्गुरुकृपेत जावं हीच एक इच्छा
    असच जप करत चालत चालत नावड टोळी, सहस्रधारा,बलगाव येथे आलो दुपार झाली होती स्वामी आज्ञेने इथे दुपारी थांबायचे ठरवले स्नान करून नागाची साधना केली स्वामींना जेवणाविषयी विचारले  त्यांनी हो म्हटल्यावर तेथील आसपास कोरडी  भिक्षा मागून स्वामींकरता  भोजन बनवले त्यांचे भोजन झाल्यावर सर्व आवरून पुढे निघालो खरंच सद्गुरू सेवा करण्यात कमालीचा आनंद मिळतो खरं सांगतो थकवा सुद्धा वाटत नाही असो
   पुढे ढाळखेडा ओलांडून खलघाट येथे आलो पुलाजवळ असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात राहायचे ठरवले तेथेच बालाजी मंदिर होते तेथील महाराज बाहेर गावी गेले होते तेथील पुजाऱ्याने शिधा दिला त्यामध्ये डाळ व आटा होता मी वर्ण चपाती बनवली पुजाऱ्याने दूध नाही म्हणून सांगितले असो
स्नान पूजन व साधना झाल्यावर स्वामींना भोजनास दिले त्यांनी माझया बद्दल विचारले मी म्हणालो दूध नाहि मिळालं मी पाण्याबरोबर खाईन ते हसले म्हणाले अर्धातास जेवू नको मैय्या दूध पाठविलं खरं तर मला खुप भूक लागली होती पण गुरु आदेश थांबलो  खुप वेळ झाला शेवटी स्वामींना विचारले ते म्हणाले बघ दूध आलं आणि आश्चर्य  पुलाजवळील एक चाय वाला दूध घेऊन आला तो म्हणे पुजाऱ्यानी सांगितले असो
 भोजन झाले सर्व आवरले स्वामींपाशी बसलो आज ते ज्योतिषविषयक काय सांगतात ते ऐकण्याची आतुरता होती
स्वामी बोलायला लागले ते म्हणाले बघ काल मी १६८५ ग्रह  आहेत सांगितले पण अजून कोणासही त्याचा शोध नाही पण हे गूढ जर ध्यान साधना केली तर समजू शकते
आता बघ ज्योतिष शास्रनुसार  कुंडलीला जास्त महत्व आहे पण कुंडली बनते कशी तर जन्मतारीख व जन्मवेळ ह्यावरून बनते असं म्हणतात पण खरे भविष्य हे जन्मवेळेपेक्षा गर्भामध्ये जिवाने जेव्हां प्रवेश केला ती वेळ खरी महत्वाची मी हे कसे कळणार म्हणून तर आपल्याकडे गर्भादान हा जो कार्यक्रम केला जातो  त्याला महत्व आहे कारण त्यावरून हिशोबाने वेळ काढता येते तू  गुरुचरित्र  वाचले आहे न म त्यात पिंडाविषयी महाराजांनी व्यवस्थित सांगितले आहे  आता लोक जी पत्रिका पहातात ते ठोक ताळे  आहेत काहींचे खरे ठरते त्याला कारण त्या मागील त्यांची साधना असते असो
आता ज्योतिष शास्रमध्ये सर्वात जास्त भीती हि शनी ह्या ग्रहाविषयी म्हणजे साडेसाती हे नक्की काय आहे किंवा प्रत्येक ग्रहाच एक  वैशीष्ठ आहे ते काय उद्या बघू तू लवकर उठला आहेस व उद्या पण लवकर उठायचे आहे तर जा झोप आता
क्रमश:--
हे बघा स्वामी भरपूर सांगतात मी सर्वाचे सार ( संक्षिप्त ) सांगतोय तुम्ही ज्ञानी आहात समजून घ्याल
ज्यांना काही शंका असेल ते फोन करू शकतात

लेखक श्री विश्वास वाड

💐   जय  गुरुदेव  💐
क्रमश:- भाग ३४
   रोजच्या प्रमाणे ३.०० वाजता उठून ध्यान, साधना, पूजा सर्व आटोपून पुढे निघालो  चिंचली व पुढे कठोरा येथे आलो  स्वामींनी दुपारी येथे थांबायचे ठरवले येथे  एका आश्रमात आलो तिथे कोणीही नव्हते त्या ठिकाणी एक ग्रामस्थ श्री जगदीश जयस्वाल यांनी त्यांच्या घरी येण्याची  विनंती केली पण स्वामी म्हणाले परिक्रमावासी कोणाच्या घरी जात नाही तुम्हांला सेवा करायची असेल तर शिधा आणून द्या त्यांनी म आता,डाळ,व मिरच्या व माझ्या साठी एक भांडे दूध आणून दिले मी स्वामींनकरता चपाती डाळ बनवली नंतर स्नान करून साधना करून स्वामींना भोजन वाढले नंतर मी दूध पिऊन जयस्वाल यांची भांडी परत करून आम्ही पुढे निघालो दुपारची साधना स्वयंपाक  व सर्व आवरणे ह्यामुळे दुपारी विश्रांती करता वेळच मिळत नाही असो
  आम्ही पुढे किनाऱ्यावरून एकादश लिंगाचे दर्शन करून पुढे निघालो पुढे नदंगाव मार्गे ब्राम्हणगावला आलो तेथे शुलेश्वर महादेव मंदिरात आलो व येथे मुक्काम करायचे ठरवले दुपारीच जयस्वाल यांनी दिलेला शिधा होता महादेव मंदिरातील एका महाराजांकडून तवा घेऊन चपाती व डाळ परत बनवली
नंतर संध्याकाळ झाली होती स्नान , साधना, पूजा करून महाराजांचे भोजन झाल्यावर मी दूध न मिळाल्याने पाण्याबरोबर चपाती खाल्ली नंतर सर्व आवरून स्वामींसमोर बसलो स्वामींनी कालचा विषय पुढे चालू केला
   स्वामी म्हणाले बघ आता शनी ह्याबद्दल सगळ्यांचे गैरसमज आहेत  शनी तसा पूर्ण वाईट ग्रह नाही पैसा देणारा शनी हाच आहे त्याचा साडेसाती बद्दल खुप वेगळ्या कल्पना आहेत आता त्याचा साडेसाती बद्दल नीट बघ
     तो  प्रत्येक राशीत अडीच वर्षे राहतो म्हणजे आपल्या राशीच्या आधीच्या राशीत आल्यावर आपली साडेसाती सुरु होते व आपल्या नंतरची राशी सोडल्यावर संपते म्हणजेच तीन अडीच म्हणजे साडेसात वर्ष पण तो साडेसात वर्ष त्रास देत नाही जर पहिल्या अडीच वर्षात त्रास झाल्यास शेवटचे अडीच वर्षे हे फायद्याचे असतात आणि जर पहिले फायद्याचे असतील तर शेवटचे त्रासाचे असतात मधले अडीच म्हणजे शनी आपल्या राशीत असतो तेव्हा फायदा व तोटा काहीच होत नाही म्हणजेच समतोलपणा असतो म्हणजे साडेसातीत  शनी फक्त अडीच वर्षच त्रास देतो हे गमतीने थोडे व्यापारी प्रमाणे झाले पण तसे पाहिले तर शनी हा जातीने तेली आहे  म्हणजेच व्यापारी आहे
  वरील गणिताचे मुख्य उदाहरण म्हणजे १० वर्षांपूर्वी  ( त्या वेळेस ) इंदिरा गांधी यांना ७५ला साडेसाती सुरु झाली आणि त्यांना आणि बाणी व अन्य कारणाने अडीच आरशात सत्ता सोडावी लागली व परत अडीच वर्षां नंतर बहुमताने परत सत्ता मिळाली हे सर्वात मोठे उदाहरण
तसेच मुलगा किंवा मुलगी ह्यांना साडेसातीचा त्रास होत नाही जो पर्यत त्यांची जबाबदारी माता पित्यावर असते त्यांचा त्रास मातापिता भोगतात तसेच सद्गुरुनिष्ठ असलेल्या शिष्याला सुद्धा त्रास होत नाही कारण त्याची जबाबदारी सद्गुरुंवर असते असो आता झोप बाकी उद्या बघू
क्रमश:--
विषय खुप चांगला चालला होता पण गुरु आज्ञा  झोपण्यास जावे लागले
लेखक श्री विश्वास वाड

💐 जय गुरुदेव 💐

💐  जय। गुरुदेव  💐
🌹 क्रमश:-- भाग--- ३५
नित्यनियमाप्रमाणे उठून ध्यान, पूजा , नागाची साधना झाली महादेव मंदिरातील महाराजांनी चहा विषयी विचारले मी सांगितले मी विशेष साधना करत आहे त्यामुळे मला चालणार नाही स्वामींना चालेल त्यांनी चहा दिला स्वामी खुप चिडले मी कोरा ( काळा ) चहा घेत नाही  स्वामी माझ्यावरच खुप चिडले खुप मला बोलले पण मी शांत  होतो मला कळलंच नाही यात माझं काय चुकलं असो
स्वामी म्हणाले मी चहा घेतल्याशिवाय निघणार नाही मी उठलो तेथून गाव थोडे दूर होते मी गावात  जाऊन दूध मागून आणले चहा बनवून स्वामीना चहा दिला डोळ्यात पाणी होते कारण स्वामी खुप बोलले म्हणाले तुला जमत नसेल तर निघून जा असो
 आम्ही पुढे निघालो चालतांना मनात विचार येत होता स्वामी विरक्त असून किरकोळ चहा करता एवढे चिडले मग माझ्या लक्षात आले हि माझी परीक्षा असावी   कारण  गेले एक सप्ताह मी स्वामींबरोबर आहे त्यामुळे मी जे अनुभवलं त्यावरून मला वाटते आजचे रागावणे म्हणजे माझी परीक्षाच
  बघा स्वामीनजवळ काहीही सामान नाही कारण सकाळी संध्याकाळी स्वामी स्नान करतात तेव्हा ते गुंडाळलेल्या  पंचालाच अंग पुसतात व परत तोच गुंडाळतात व जुना रामदास धुवून पंचावरून गुंडाळतात हे एक उदाहरण झाले अशे अनेक प्रसंग येताना रस्त्यात घडले प्रत्येक वेळेस हे निर्विकार होते म विचार येतो ज्यांना वस्त्राची सुद्धा  आसक्ती नाही ते दुधाच्या चहा करता एवढे चिडतील का ? म्हणजेच मी चिडतो का उलटून बोलतो का असो
आम्ही तेथून निघालो तेथील महाराजांनी मला स्थिर रहो इतकंच निघतांना सांगितले  मी सर्व विसरून मनात जप सुरु केला व चालायला लागलो
पुढे विश्वनाथ खेडा नंतर मारू कि चिंचली इथलं शिवमंदिरात आलो स्वामी म्हणाले आपण माध्यांनी येथेच राहू  मी स्वामींना भोजनाविषयी विचारले ते नाही म्हणाले म मी स्नान करून माध्यान्ह साधना केली नंतर स्वामी माझ्याजवळ आले माझया डोक्यावरून हात फिरवला म्हणाले कारे सकाळचे वाईट वाटले का  पण लक्षात ठेव मांजरीचे  दात मांजरीच्या पिलाला लागत नाही  मला खूप भरून आले खरंच  सद्गुरू प्रेम हे मातृवत असते ह्यात थोडीही शंका नाही मी काहीच बोललो नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले काय रे काय झालं म मी म्हणालो स्वामी आईला रागवण्याचा पूर्ण अधिकार असतो त्यामुळे मुलाला त्याचा राग येत नाही असो त्यांच्या ह्या वागण्याने मला खराच काही कळले नाही खरच  आज आई मुलासारखे झाले जस आई मुलाला खुप रागावते व काही वेळाने त मुलाला जवळ घेते असो
   दुपारी येथून निघालो स्वामीं विषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले नक्की हे कोण व कुठले आहेत हे मलाच का भेटले ह्यांना नक्की काय आहे हे चालतांना बोलतांना वागताना किती शांत निर्विकार व अलिप्त आहेत असं आपण होऊ शकू का
परत एक विचार येई ते कुठले कोण ह्याचा शोध का घेयचा आपली तेवढी पात्रता आहे का हि नियतीची काही तरी अजब लीला आहे म्हणून ते माझ्या सोबत आहेत मी साधनेचा ज्ञानाचा भुकेला  आहे त्यांचे कडून जे
मिळेल ते आत्मसात करू उगाच ते कोण कुठले हा विचार करून वेळ वाया घालवायचा नाही आणि ते कोणीही असले तरी ते आता माझे सद्गुरू आहे त्यामुळे त्यांच्या विषयी विचार येणे हे पाप आहे मला गुरुचरित्रातील भिल्लची गोष्ट आठवली सद्गुरू कोणीही असला तरी ते श्रेष्ठच त्यांचे वाक्य ब्रम्हवाक्य  असे अनेक विचार मनात चालू होते त्यामुळे बराच वेळ जप होऊ शकला नाही वाईट वाटले  स्वताच्या मनाला सक्त ताकीद दिली पुन्हा असले विचार करून वेळ वाया जाता कामा मन खरोखर किती विचित्र असते ह्याचा अनुभव आला असो
विचारांच्या तंद्रीत लोहारा येथे येऊन पोहचलो येथे कपिल मुनींचा आश्रम आहे कपिल मुनींनी येथे तपश्चर्या केली असे म्हणतात
स्वामींनी आज येथे मुक्काम करू असे सांगितले तेथे बाहेर ओट्यावर सामान ठेवले तेथील महाराजांना भेटलो व दोन मूर्ती आहेत असे सांगितले ते म्हणे शिधा घेता का आश्रम प्रसाद चालेल स्वामी म्हणाले आश्रम प्रसाद मला चालेल पण माझा शिष्यास ( मला) फक्त आटा द्या बाकी काही नाही असल्यास दूध द्या तेथील महाराजांनी कारण विचारले मी साधना चालू आहे असे सांगितले मला त्या महाराजांनी आटा दिला स्वामी म्हणाले वेगळे दूध चपाती खाण्यापेक्षा दशम्या ( दुधातच कणिक भिजवून चपाती बनवणे ) बनव  म्हणजे छान लागेल असो
मी संध्याकाळचे स्नान साधना पूजा करून स्वामीच्या भोजनाचे ताट आणले त्यांचे भोजन झाल्यावर मी दशमी खाल्ली सर्व आवरून स्वामीनसमोर बसलो
स्वामीनीं बोलण्यास सुरवात केली ते म्हणाले रस्त्याने तू माझ्याविषयी जो  विचार करत होतास त्या सर्व प्रश्नांची  उत्तरे मी तुला योग्य वेळी देईन मी म्हणालो चालेल पण मला कोणतीही शंका नाही कारण आपण सद्गुरू आहात मला शंका घेऊन गुरुद्रोही व्हायचे नाही ते फक्त हसले त्यांच्या प्रत्येक हसण्यात वेगळेपणा जाणवतो असो
स्वामी म्हणाले आपण कालचा


क्रमश:-- भाग ---३६
स्वामींनी बोलण्यास सुरवात केली ते म्हणाले काल आपण शनी विषयी बघितले आज आपण गुरु ह्या ग्रहा विषयी बघू  लोक म्हणतात की गुरु प्रबळ असला तर फायदा होतो पण नीट विचार केला तर तसे नाही बघ कसे ते
   बघ गुरु हा ग्रह संन्यासी आहे तर संन्यासी पैसे कसे दिल पण गुरु हा प्रबळ असला तर ज्ञान अमाप मिळते सन्मान प्रतिष्ठा मिळते  आता उदाहरण  बघ  मी कुठला कोण तुला काही माहीत नाही माझी सांपत्तिक स्थिती तुला माहीत नाही तरी तू माझा आदर करून सद्गुरू पद दिलेस याचे कारण माझा गुरु ग्रह प्रबळ आहे गुरु हा ग्रह विद्ववत्ता प्रदान करतो त्यामुळे पैसा देणारा ग्रह शनी व प्रतिष्ठा देणारा  ग्रह गुरु असो आता बघ कुंडलीत असे काही योग असतात की मनुष्य त्यामुळे विचारमग्न होतो
जस मंगळाची कुंडली, पितृदोषाची कुंडली कालसर्प योगाची कुंडली  असं अनेक आहेत
नीट विचार केला तर  प्रत्येक कुंडलीत काहीन काही दोष असतो म्हणून घाबरणे हे चुकीचे आहे
आता मी एक उदाहरण देतो बघ कालसर्प दोष कालसर्प दोष फक्त एकच प्रकारचा नाही तर बघा कालसर्प, अर्ध कालसर्प त्रिकोणी कालसर्प असे एकंदर  ५१ प्रकारचे कालसर्प  दोष आहेत आणि माणूस दोष म्हटलं की घाबरतो तर तस नाही जस राहू केतू जप, शिवसाधना,
अश्वथसाधना असे वेगवेगळे कालसर्प योगावर उपाय आहेत आणि ज्योतिष शास्रमध्ये खुप खोल अभ्यास आहे फक्त वरवर ठोक ताळे आले म्हणजे ज्योतिष आले असं नाही  लक्षात ठेव प्रत्येक शास्रला अभ्यास व साधना महत्वाची आहे  आणि सर्वात महत्वाचे  कुंडलीतील  कुठलाही दोष दूर करण्याकरता आपण त्या साधनेत किती एकरूप असतो हे अत्यन्त महत्वाचे आहे
    आणखी एक आपण दोष जाण्याकरता जो उपाय करतो त्यांनी भोग नष्ट होत नाहीत तर भोगाची तीव्रता कमी होते म्हणजे जर सर्पदंश होणार असेल आणि उपाय केला तर सर्पदंश न होता  सर्प समोर येऊन मनात भीती निर्माण करतो
म मनात विचार येईल की पत्रिकतेतील  भोग नष्ट होण्याकरता व सर्व भविष्य  बद्दलण्याकरता  सर्वात महत्वाचा  उपाय कोणता तर तो एकच म्हणजे पूर्णपणे मनात कोणतीही शंका न ठेवता  सद्गुरूंला शरण जाणे गुरुनिष्ठ गुरुसेवा प्रति एकाग्रता अत्यन्त महत्वाची पण मनुष्याकडून हे होते का हा खरोखर संशोधनाचा विषय आहे असो हा खुप मोठा विषय आहे जाऊ दे बाकी उद्या बघू तू झोप आता
क्रमध:--
स्वामी खुप काही बोलले सगळं लिहण खुप कठीण आहे मंगल दोषांवर सुद्धा स्वामी अर्धा तास बोलले स्वामी रोज दोन ते अडीच तास बोलत
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- ३७
नित्यनियमांप्रमाणे ३ वाजता उठलो ध्यान, स्नान, संध्या, साधना, पूजा सर्व आटोपून ७ वाजता पुढे जाण्यास निघालो लोहारा गावातच कपिलाश्रमा पुढे एका घरातून चहाकरता  आवाज आला त्यांनी घरात बोलावले पण स्वामींनी घरात येण्यास नकार दिला म तिथेच ओट्यावर बसलो त्यांनी स्वामींना चहा दिला मी चहा घेत नाही असं सांगितलं असो
    पुढे महिपुरा येथे शिव मंदिरात आलो स्वामींनी  दुपारी येथेच थांबायचे ठरवले म आजूबाजूच्या घरातून शिधा मागून स्वामीन करता खिचडी बनवली नंतर स्नान करून दुपारची साधना केली स्वामींचे भोजन झाल्यावर सर्व आवरून पुढे निघायचे ठरवले स्वामी म्हणाले इथून दोन तीन मार्ग आहेत आपण प्रथम दत्तवाडा  जाऊ नंतर बघू  मैय्या  ठरविलं मग  आम्ही मधल्या रस्त्याने दत्तवाडा येथे निघालो आम्ही दत्तवादा येथे पोहचलो
    दत्तवादा येथील कपालेश्वर महादेव मंदिरात आम्ही थांबलो  आम्ही  बाहेर थांबत होतो तेथील पुजाऱ्याने  सांगितले म्हाराजजी थंडी बहोत होती है आप अंदर रुकिये स्वामीनीं मान्यता दिली आम्ही आत थांबलो तेथिल  पुजाऱ्याने स्वामींकारता शिधा दिला भांडी पण दिली शिध्यात बरेच काही होते म मी वरण भात, टॉमेटो बटाटा भाजी चपाती आणि त्या पुजार्यांनी रवा तूप साखर पण दिली होती मी शिरा पु बनवला नंतर स्नान संध्या साधना पूजा झाल्यावर स्वामींना भोजनास दिले ते म्हणाले बघ मैय्याच  प्रेम आज  गोडाचे भोजन मिळाले म मी दूध चपाती घेतली सगळे आवरून स्वामीन समोर बसलो
   स्वामी  म्हणाले आपण दोन तीन दिवस ज्योतिष विषयक बोललो  यात एक महत्वाचे कि ग्रह किंवा त्यांची दृष्टी वाईट असली तरी सद्गुरू कृपा जर असेल तर भविष्य बदलते म सद्गुरू अनुग्रह व सद्गुरुकृपा  व सद्गुरुसेवा ह्या सर्व विषयी आपण बघू
प्रथम अनुग्रह  आता बघ  अनुग्रह म्हणजे फक्त कानात मंत्र घेणे एव्हढेच नाही त्या मागील सर्व तथ्य बघू
सद्गुरू ज्या वेळेस कानात मंत्र देतात त्यावेळेस ते मंत्राद्वारे शिष्याचा शरीरात प्रवेश करण्यास सुरुवात करतात  ह्याचा नक्की अर्थ काय आपण उद्या बघू झोप आता
क्रमश:---
स्वामी खुप सुंदर विषय निवडतात व बोलतात पण सुरवात करून विचार करण्यास प्रवृत्त करतात
लेखक श्री विश्वास वाड

💐   जय गुरुदेव  💐
क्रमश:--भाग ३८
पहाटे नेहमी प्रमाणे ३-०० वाजता उठलो ध्यान साधना झाली आज जरा थंडी खुप आहे स्नान करायला जायची हिम्मत होत नव्हती स्वामीनीं ओळखले ते म्हणाले तुला संध्या पूजा साधना हे करायला वेळ लागतो जर सात वाजेपर्यत तुझे नाही झाले तर मी निघून जाईन मग मात्र हिम्मत केली स्नानास गेलो स्नान करून अक्षरश: कुडकुडत होतो तेथील प्रेमदास महाराज हसत होते असो
साधना संध्या पूजा केली प्रेमदासांनी विचारले चहा घेणार का मी म्हटले साधना चालू आहे चहा चालणार नाही मग त्यांनी गरम पाणी प्यायला दिले ह्याला म्हणतात दुधाची तहान ताकावर भरवणे असो
स्वामींनी दिलेल्या वेळेच्या आत म्हणजे ६.३० वाजताच तयार झालो स्वामींचे स्नान झाले त्यांनी चहा घेतला व आम्ही पुढे निघालो
स्वामी म्हणाले आपण खुप वेगळ्या रस्त्याने जाऊ तिथून आम्ही दही बेहडा पिप्पलूद मार्गे दुपारी कारावद येथे आलो रस्त्यातच खैरी गावात स्वामीच्या सांगण्यावरून शुस्क भिक्षा मागून घेतली होती
कारावद येते माताजींचा आश्रम आहे तेथे दुपारचे थाबायचे ठरवले माताजिंकडून भांडी घेऊन स्वामींकरता भोजन बनवले मला दूध मिळाले नाही म्हणून मी जेवलो नाही
असो सर्व आवरून पुढे निघालो
पुढे राजघाट येथे आलो येथे
श्री प.पु.वासुदेवानंद टेम्बे स्वामी स्थापित एकमुखी दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी मुक्काम करायचे ठरवले
तेथे सदावर्त ( शिधा ) मिळाला स्वामींकरता खिचडी बनवली व माझया करता दोन चपात्या  बनवल्या नंतर स्नान करून साधना पूजा आरती करून आज येथे स्वामींच्या आज्ञेवरून येथील दत्ताची पण आरती केली नंतर भोजन झाले
स्वामींसमोर येऊन बसलो त्यांनी बोलण्यास सुरवात केली त्यांनी ग्रहांविषयी पुन्हा दोन दिवसांनी बोलेन असं सांगितले आज मी तुला दानाविषयी सांगतो
बघ अनेक प्रकारची दाणे आहेत ह्यामध्ये सर्वात जास्त होणारी दाने म्हणजे दक्षिणा वस्त्र आणि अन्न  हि दाने होतात आता बघ सर्वच दाने चांगली करावी पण अन्नदानाला सर्वात जास्त महत्व आहे कारण त्यानी आत्मातृप्ती  होते बाकी कोणत्याही दानाने आत्मातृप्ती होतेच असं नाही आपण ज्याला दान देतो त्याची योग्यता लागते म्हणजेच दान सत्पात्री व्यक्तीलाच द्यावे असे शास्त्र सांगते अन्यथा दोष आहेत ह्यासाठी मी तुला एका चक्रा विषयी सांगतो नीट ऐक
समज एखाद्या व्यक्तीने तुला ५०रु.दक्षिणा दिली आणि तू त्या दक्षणेचा गैरवापर केला तर त्याचा दोष  ज्यांनी तुला दान दिले त्याला जातो कारण योग्यता नसताना दान दिले गेले  हे सर्व दानांना लागू आहे अन्नदान सुद्धा समोर बसूनच करावे ह्या विषयी मी तुला उद्या आणखी विस्तार पूर्वक सांगेन  झोप आता
क्रमश:---
खरं सांगतो हे विस्तारपूर्वक ऐकण्याची खुप इच्छा होती पण काय करणार स्वामी आज्ञा थंडी वाजतेय झोप येत नाहीये ते बोलले त्यावर विचार करत पडलो
लेखक श्री विश्वास वाड

💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:---भाग ३९
नित्यनियमाप्रमाणे पहाटे ३.०० वाजता उठून ध्यान,साधना, पूजा,झाली खरोखर दत्तपभुंची ,मैय्याची व सर्वात मुख्य माझ्या सद्गुरुंची माझ्या वर खुप कृपा आहे त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी येते
इथे बघा माझ्या वरील कृपेचा अनुभव ज्या एकमुखी दत्ताची स्थापना
श्री प.पु.टेंबे स्वामींनी केली त्या दत्तास अभिषेक ( माझ्या हस्ते ) करायला मिळाला माझ्या जवळ काहीही नसताना तेथील पुजाऱ्याने सर्व काही देऊन दत्तास रुद्र अभिषेक केला खूप समाधान मिळाले अभिषेक करत असताना डोळे भरून आले काय योग असो
सर्व होईपर्यंत आठ वाजले पुढे तेथून निघालो स्वामी नि सांगितल्या प्रमाणे वेगळा रस्ता म्हणजे आम्ही कुलि घोंगसा न जाता आम्ही बडवानीस निघालो पुढे बडवानीस एका सद्गृहस्थाने थांबवून स्वामी चहा दिला नंतर आम्ही पाटी मार्गाला लागलो खुप चढण आहे घाट रस्ता आहे खांद्यावरील सामान घेऊन चढताना अक्षरश: दमछाक होतेय पण स्वामी रस्ता एकदम सोपा आहे असेच चालत होते
नंतर आम्ही बावनगजा पाशी आलो मी खुपच दमलो होतो स्वामी म्हणाले दुपारी आपण येथे थांबू
स्वामीनीं सांगितले ह्या डाव्या बाजूला जैन लोकांचे देवस्थान आहे वरती ५२ गज उंच बुद्ध मूर्ती आहे जायचे का माझी अजून वर चढण्याची हिम्मत नव्हती मी नम्र पणे नकार दिला व म्हणालो आपली आज्ञा असेल तर जाऊ ते म्हणाले ठीक आहे नाही जायचे हे ऐकून खुप आनन्द वाटलं स्वामीनीं ओळखले ते फक्त हसले असो  तेथेच मैय्या नसल्याने हॅन्ड पंप वर स्नान करून साधना केली
दुपारी विश्रांती घेऊन पुढे पाटीस आलो येथील साई मंदिरात मुक्क्म करायचे ठरवले
इथे पण मैय्या नाही जवळपास भिक्षवृत्तीने शिधा आणला समोरील एका मातारामने वातीचा स्टोव्ह दिला त्यामुळे चूल न बनवता स्टोव्हवर खिचडी चपाती व भेंडयाची भाजी बनवली नळावर स्नान करून साधना पूजा आरती करून स्वामींना भजन दिले नंतर मी दूध चपाती खाल्ली सर्व आवरून स्वामींसमोर बसलो
स्वामींनी बोलण्यास सुरवात केली ते म्हणे मी काळ तुला अन्न दान समोर करावे ह्या विषयी बोललो मी तुला एक  दृष्टांत सांगतो नीट ऐक
   एका मंदिरात एक  अतिशय सात्विक महाराज रहात होते आयुष्यात त्यांच्या कडून कुठलेही वाईट कर्म झाले नव्हते त्यांनी मुंगी सुद्धा मारली नव्हती
   एकदा ते डाळ-वाटी बनवत होते तेथे एक गरीब माणूस आला तो म्हणाला महाराज मी दोन दिवसांपासून उपाशी आहे मला भोजन द्याल का महाराज म्हणाले बस डाळ-वाटी होत आली आहे नैवेद्य दाखवतो व तुला देतो नंतर महाराजांनी त्याला एका पत्रावळीत दोन वाट्या व त्याला भरपूर तूप लावून दिले आणि खा म्हणाले तो  म्हणाला महाराज मी मैय्या किनारी बसून खाईन व तेथेच पाणी पेईन म्हहाराज म्हणाले ठीक आहे तो गेला
     काळ परत्वे महाराजांनी देह ठेवला वर कंपोल कल्पित यम दरबारात महाराजांना  उभे करण्यात आले यमानी चित्रगुप्तांस विचारले यांचे पाप व पुण्य किती चित्र गुप्त म्हणाला यांचे सर्व पाप आहे पुण्य काही नाही महाराजांना आश्चर्य वाटले ते म्हणाले असं कसं तुलाही आश्चर्य वाटलं न कि ते तर सात्विक होते मुंगी पण मारली नाही मी असं कसं
  मी म्हणालो हो खरंच आश्चर्य आहे हे असं कसं हो स्वामी ते म्हणाले मी हे कसं झालं हे उद्या सांगीन झोप आता मी काही तेथून हाललो नाही स्वामी म्हणाले एकदा सांगितलन उद्या तर उद्या तू कितीही वेळा बसलास तरी सांगणार नाही खुप हुरहूर लागली पण काय करणार गुरुआज्ञा तेथून उठलो मी ते सर्व ऐकून येणारी झोप पळाली
क्रमश:--
खरं सांगतो गुरु आज्ञेव्यतिरिक्त साधकाला दुसरं मोठं काही नाही ह्या त्यांच्या अर्धवट सांगितलेल्या कथेवरून कळले की आपण कुठलीही गोष्ट समजून घेण्याकरता अधीर नसावे स्थितप्रज्ञता असावी
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव 💐
🌹 क्रमश:---- भाग ४०
नित्यनियमाने पहाटे उठून ध्यान, साधना,पूजा करून पुढे निघण्यासाठी ६.३० ला तयार झालो  मंदिरासमोरील मातारामने स्वामींना चहा दिला नंतर आम्ही पुढे निघालो
रस्त्याने चालत होतो मनात अजपा जप चालू होता आज महाराजांची आठवण येत होती ती म्हणजे कि मी त्यांच्या पासून दूर आहे त्यांच्या जेवणाचे काय होत असेल असे विचार येत होते त्यामुळे मधूनच जप थांबत होता
असो माध्यांना करता रस्त्यात एका झाडाखाली थांबलो खुप मोठे झाड होते त्या मुळे भरपूर सावली होती तिथे एक ओहळ होता तेथे स्नान केले साधना केली तेथे जवळपास काहीच नव्हते त्यामुळे स्वामींच्या जेवणाचे पण नाही झाले स्वामी म्हणाले मला पण भूक नाही असो
पुढे बोकराटा येथे श्री राम मंदिरात उतरलो मंदिर खूपच लहान आहे असो तेथे बाजूला असलेल्या किराणा दुकांदाराने शिधा दिला मी स्वामींनकरता खिचडी बनवली आटा न मिळाल्याने चपाती नाही बनवली तेथील नळावर स्नान करून संध्या  साधना पूजा केली स्वामींना भोजन दिले बाकी बंदी घासून दुकानदाराने मला फक्त  एक ग्लास दूध दिले ते प्यायले सर्व आवरून स्वामींसमोर बसलो कारण कालच त्या महाराजांचं काय पाप
 स्वामींनी बोलण्यास सुरवात केली की काळ बघितले चित्रगुप्तांने सांगितले ह्यांचं सर्व पाप आहे त्या म्हाराजाने सांगितले माझे काय पाप आहे तर चित्रगुप्तांने सांगितले की तुमच्या नावावर बऱ्याच हत्या आहेत त्या म्हाराजाने सांगितले क्स शक्य आहे मी कधी मुंगी सुद्धा मारली नाही तेव्हा चित्रगुप्त म्हणाले की तुम्ही जु माणसाला भोजना करता तू लावून वाटी दिली त्याने नर्मदा किनाऱ्यावर जाऊन काठीला वातीचा तुकडा लावून मासा मारला व तो मासा बाजारात विकला तेव्हा त्याला कळले की मासेमारीच्या पैसे मिळतात त्याने तोच उद्योग सुरु केला मासे मारी म्हणजे हत्याच त्यांनी आजपर्यत जितके मासे मारले त्या सर्व हत्या तुमच्या नावावर झाल्या कारण पहिला मासा तुमच्या वाटीच्या मारला गेला व त्याला हा हत्येचा मार्ग मिळाला म्हणून सर्व हत्या तुमच्या नावावर म्हणून अन्नदान हे समोर करावे व कुठलेही दान सत्पात्री करावे म्हणजे त्याची योग्यता आहे का आपण दिलेल्या दानाचा योग्य विनियोग होईल तरच दान द्यावे कळलं झोप आता बाकी उद्या बघू
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव। 💐
🌹क्रमश:---   भाग ४१
नित्यनियमाने पहाटे उठलो ध्यान, झाले थंडी होती पण स्नान तर करायचेच कारण परिक्रमा, साधना ,पूजा,करायची आहे असो स्नान झाले नित्य कार्यक्रम आटोपले खूपच थंडी होती मी नळावर स्नान करीत असतांना त्या समोरील व्यक्तीने बघितले त्यांनी चहा विषयी विचारले पण मी त्याला नाही म्हटले गरम दूध आहे का विचारले तो घरात गेला
      स्वामीनीं हे ऐकलेले चिडले म्हणाले एवढी थंडी वाजते तर मागे फिर तुला काय निमंत्रण दिले होते का लाज नाह वाटत कोणाकडे काही मागताना आपण माध्यांनी जे मागतो ती भिक्षा तू आत्ता जे दूध मागितले ती भीक
अरे भिक्षा मागणे म्हणजे अंह नष्ट करणे व भीक मागणे म्हणजे लाचारी पत्करणे भीक मागून तू गुरूंचा अपमान होतो हे लक्षात येत नाही का जमत नसेल तर निघून जा खूप खूप बोलले खर्च असाह्य होत होत पण चूक माझीच होती शेवटी मी त्यांच्या पायावर डोकं ठेऊन क्षमा मागितली
ते म्हणाले माझी नाही तू व्यक्ती येईल तिच्या पायावर डोकं ठेव व क्षमा माग थोडं विचित्र वाटले पण गुरुआज्ञा असो
ती व्यक्ती गरम दूध घेऊन आली स्वामीनीं सांगितले दूध  नाही चाहिये  इसका मी त्या व्यक्तीच्या पायावर डिके ठेऊन माफी मागितली ती व्यक्ती म्हणाली ये क्या कर रहे  हो मी म्हणालो मैने आपसे दूध मांगा ये गलती हो गई  मैं परिक्रमा कर राहा हूं मुझे मागना नाही चाहिये
स्वामी म्हणाले मला थंडी नाही वाजत का माझ्या अंगावर तर हया पंचा आहे तो सुद्धा ओला आहे पण साधकाकडे सहनशीलता हवी असो
     ती व्यक्ती गेली तिने त्या दुधाचा चहा करून स्वामी करता आणला स्वामीनीं हातात घेतला त्या कडे पाहिले व त्या व्यक्तीस प्रसाद म्हणून परत दिला त्या व्यक्तीला म्हणाले ये मेरा शिष्य है या इसको थंड लग रही है ये कुछ नाही लेंगा तो मै भ कूछ नाही लुंगा आप ये मैय्या प्रसाद समजकर ले लो
मला खुप वाईट वाटले कारण माझ्या मुळे स्वामी पण चहा न पिता निघणार आहेत स्वामी मला म्हणाले मी तुला त्याला नमस्कार करण्यास का सांगितले हे रात्री सांगीन
आम्ही पुढे निघालो पुढे बारीफलिया येथे आलो स्वामी म्हणाले आपण येतून रस्ता बदलू असं म्हणून स्वामी तेथिल कोरड्या नाल्यात उतरले तेथून पाय वाटेने निघालो पूर्ण  जँगल रस्ता होता ते म्हणाले आपण येथून  शूलपाणी झाडीत जाऊ  पूर्ण घनदाट रस्त्याने संध्याकाळी आम्ही रानीपुर  येथे पोहचलो  तेथे एका एका झाडाखाली मुक्काम करायचे ठरवले येथे जवळ पास काहीही घर दिसत नव्हते स्वामी म्हणाले आज उपवास करायचा का मी काही बोललो नाही थोडा वेळ गेला असेल मी तेथे जवळ असलेल्या ओहळावर स्नान करण्यास जाऊ का असे विचारले ते म्हणाले थांब मैय्या आपल्याला शिधा किंवा भोजन पाठवतेय  काय येत बघू मग जा अजून थोडा वेळ गेला असेल एक व्यक्ती समोरून यरत होती त्या व्यक्तिच्या अंगावर फक्त एक लंगोटी आणि खांद्यावर एक पंचा होता व हातात एक फडक्यात काही तरी गुंडाळलेले होते
  ती व्यक्ती समोर आली स्वामीना नर्मदे हर म्हणून नमस्कार केला व म्हणाला आप परिक्रमावासी है ना स्वामी म्हणाले हा म त्या व्यक्तीने फडक्यात गुंडाळलेले स्वामींनसमोर ठेवले ये आपले लिये है आणि ती व्यक्ती निघून गेली स्वामींनी उघडून बघितले तर त्या पाच सह चपात्या होत्या व थोडेसे तूप साखर होते स्वामी हसले ते म्हणाले चल स्नान करून येऊ सामान तेथेच ठेऊन आम्ही ओहळावरून स्नान करून आलो मी साधना पूजा केली आणि आश्चर्य मी मातारामने दिलेला जप करीत असताना मातारामाने दिलेला नाग जिथे ठेवला होता त्याचा मागे काही अंतरावर खरा नाग आला मी घाबरलो स्वामींनी पाहिलं ते म्हणाले घाबरू नको तुझा जप चालू ठेव तो काही करणार नाही मी मनाचा हिय्या केला डोळे बंद केले व जप चालू ठेवला जप संपल्यावर हळूच डोळे उघडले तर समोर नाग नव्हता स्वामी म्हणाले अरे काय बघतोय तो त्याचा मार्गाने गेला हा शुभं संकेत आहे म्हणजे तुझी साधना योग्य चालु आहे हे ऐकून कुओ बरे वाटले
इथे दूध नाही मी पाण्या बरोबर चपाती खाल्ली स्वामीनीं तुपसाखर व चपाती खाल्ली असो मी स्वामींसमोर बसलो आज ते काय सांगतील ह्या विषयी उत्सुकता होती
क्रमश:--
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- भाग ४२
सर्व आवरून मी  स्वामींपाशी बसलो आता आज स्वामी काय सांगतील हि उत्सुकता होती
स्वामी म्हणाले सकाळी मी तुला त्या माणसाच्या पाया पडायला सांगितले तुला अपमान तर नाही वाटलान मी म्हटलं माझा मान अपमान सर्व तुमच्या चरणावर आणि तुमची आज्ञा मला सर्वस्व  आहे
स्वामी म्हणाले मी तुला नमस्कार करायला सांगितले कारण नत झाल्याने अहंकार नष्ट होतो कारण तू परिक्रमा करतोयस कोणालाही हे द्या सांगणे म्हणजे परिक्रमेचा अहंकार पण तुला अहंकार आहे की नाही हे बघायचे होते पण तू कुठलाही किंतु मनात न ठेवता लगेच नत झालास म्हणजे तुला अहंकार नाही म्हणजे तू योग्य साधक होऊ शकतो असो
काल आपण  अन्नदानाविषयी बघितलं बघ अन्नदान आणि इतर दान ( वस्त्रदान,गोप्रदान ,दक्षिणादान, व बरीच )ह्यात अन्नदानच श्रेष्ठ आहे कारण अन्नदानाने आत्मातृप्ती होते बाकी कुठल्याही दानाने आत्मतृप्ती होतेच असं नाही
कोणी अन्नदान केलं तरी ते खरं साधू संन्याशी किंवा साधक स्वीकारत नाही कारण अन्नाला सुद्धा दोष असतात ह्याचा तुला एक दृष्ट्यांत देतो
एका एक अतिशय सज्जन साधु रहात होता तो शुष्क भिक्षवृत्तीने उदरनिर्वाह करत असे पण एकदा एका व्यापाऱ्याने जबरदस्तीने त्या साधुस जेवायला बोलावले साधू  मनाविरुद्ध त्याचा कडे जेवणास गेला त्याने साधूला रजत  ( चांदी ) पात्रात भोजन दिले साधूने त्या व्यापाराचे लक्ष नाही असं बघून एक वाटी त्याने झोळीत टाकली सर्व झालयावर तो साधू जय ठिकाणी राहत होता तेथे आला आपल्या देवतेसमोर आल्यावर त्या साधुस विचत्र व अस्वस्थ वाटायला लागले त्याने न राहून शेवटी उलटी केली सर्व अन्न बाहेर पडले त्याला थोडे बरे वाटले नंतर त्याने आपली झोळी बघितली व त्यात रजत वाटी बघून तो आश्चर्यचकित झाला त्याने त्या व्यापाऱ्यास बोलावणे पाठवले बाकी काय झाले ते उद्या सांगेन झोप आता
मी स्वामीना नमस्कार करून म्हटले असं रोज का करता मला फार उत्सुकता लागते तेव्हा स्वामी म्हणाले साधकाने एखाद्या गोष्टीत इतके रममाण  व उतावीळ होऊ नये ह्यालाच स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात झोप आता
कर्मश:--
मी झाडापासून जरा दूर झोपला होतो पडल्या पडल्या विचार चालू होता की मला स्थितप्रज्ञ अवस्था येईल का व कधी तेवढ्यात स्वामी ओरडले झोप आता झोप येत नसेल तर जप कर विचार करून वेळ वाया घालवू नये
लेखक श्री विश्वास वाड