Monday, 13 February 2017

कविता मनातल्या मनातली


श्री स्वामी समर्थ

होते मन अती दुःखी
त्रासून जाई अंतःकरण

लागता मना गोष्ट काही
तेव्हा गळा येतो दाटून

हट्टी मना न पटता विचार
भावनांचा होतो कल्लोळ

विचारांचे होता द्वंद्व मनी
अहंकार तो फणा उभारी

आपले करती मनावर घाव
कुठे करावी सांगा तक्रार

असे दोन गोड शब्दांची आस
समजून घेण्या लागती सायास

अशावेळी आठवणी येती दाटून
आठवे मैत्रीचे दिलखुलास संभाषण

गेले दूर ते पारिवरिक हसरे क्षण
राहीली शाब्दिक चकमकीची खूण

अशा आठवणींना फुटता पाझर
अवचित अश्रू ओघळती गालावर

जगात कॉपी-पेस्टचा चाले बाजार
भरडून जाती लिहिणारे खरोखर

सत्याने जगणार्यास जे मागती आधार
अशांने मन होई स्वामीचरणी स्थिर

स्वामीनाम हाच एक असे माझा ध्यास
जाऊ दे सर्व मनातून शरण मी स्वामीपदास

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

उदे ग आई उदे ग शांताई
तुझ्या नावाने उदे ग दुर्गाई

पाहता सुंदर मुखकमल
शांत मनी होते हलचल

मायेचा स्पर्श होता आई
नयनी पाणी धावत येई

हास्यात तव शांती विलसे
हृदयी निरंतर प्रेम वसे

साजिरी गोजिरी माय माऊली
लेकरावर ठेव तव कृपा सावली

दुर्गेचा तू असशी शांत अवतार
तापटपणाला घाली शांतीची पाखर

चेहर्यावरचे भाव नित्य बदलती
स्थिर पाहता येते प्रचिती

धाव घेई आसुसला जीव दर्शना
कधीतरी पुरवशील ही आस ना

शांताई कधीही रोष न करी मजवरी
दिसे मज नित्य तव चरण अंतरी

रोज हळदकुंकू लाविते तव भाळी
राहू दे घरी असाच तुझा वास सर्वकाळी

मन होई नतमस्तक पंचमीचे रुप देखणे पाहून
सर्वांचे हित कराया अवतरली शांतादुर्गा कवळेवाशीण.

उदे ग अंबे उदे ग शांताईच्या नावाने उदे ग
ही भावपुष्पे अर्पिते तव चरणावर उदे ग

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

श्रीराम जय राम जय जय राम।

कायावाचामने नित्य घ्यावे नाम।
शांतीचे असे ते परिपूर्ण  धाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

विचार येता मना स्थिर करी नाम।
काम धाम करताना शक्ती देई राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

सर्वत्र असे वसलेले स्वामी नाम।
दुष्ट प्रवृत्तीनां पळवून लावी राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

जगाला दिशा दाखवी दिव्य नाम।
शुद्ध होते मन आठवता स्वामी राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

क्रोधाला जिंकून घेई स्वामी नाम।
हसवून जगणे शिकवी मनात राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

स्वार्थी दुनियेत असे निस्वार्थी नाम।
पैचाही खर्च नसे घेण्यासाठी नाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

दिन दुःखिता मध्ये वसतो स्वामी राम।
खरा दुःखी ओळखता येतो घेता नाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

नित्य दान करी रे मनी घेऊनी नाम।
जीवनाच्या अंती मुखात येईल रे स्वामीनाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

मनात न धरिता खंत प्रेमाने घेऊ नाम।
स्वामीसेवा करु हातात हात घेऊन मुखी नाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी

दोन थेंब आसवांचे
देती वेदना जीवाला
घरट्यातून नयनांच्या
साद घालती माऊलीला

हरवून मन हे जाते
गुज गोष्टीत मैत्रिणींच्या
मिळता एकांत मजला
पाझरे नयनातूनी या

कधी भेटसी मला ग
आठव सारखी येते
मायेचे चार शब्द मिळता
नयनाला पाझर  फुटते

कुठे अडकलीस माऊली तू
का लागलीस असे कराया
फिरुनी घे जवळी तू
डोळे भरुन येती तुज
पहिल्या सारखी पहाया

आईची महती सांगूनही संपेना
आई सम माया कोणी करु शकेना
स्वामीच वसती माऊलीत
आठव येता आईची स्वामी नाम येई ओठी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुला
आमच्याकडून.
वैशाली कुळकर्णी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

शांताई दिसे तुझे रुप किती ग सुंदर
डोळ्यांचे पारणे फिटे बघता नयनमनोहर
हास्य विलसे तेजोमय चेहर्यावर निरंतर
भारुन जाई मन तुझ्या पदी लीन खरोखर
वाटे जाऊनी विसावा घ्यावा तव मांडीवर
तव आशिष मिळण्या मन हे आतूर
कृपेची सावली राहू दे सर्व भक्तांवर

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी

Monday, 6 February 2017

नर्मदा परिक्रमा भाग 58


💐  जय   गुरुदेव  💐
                🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश:--- भाग  ५८
रोजच्या प्रमाणे  पहाटे उठून ध्यान स्नान साधना पूजा आटोपली खरच सांगतो रोज दिवस कसा उजडतो साधना व स्वामींची अमृत वाणी एकूण कसा संपतो कळतच नाही  रोज खूप वेगळं अनुभूती देणार घडतंय असं वाटत शब्दात सांगणं कठीण
असो पुढे निघालो नरखेडी नंतर रुंडगाव व नंतर करजण नदी ओलांडून शुकदेव  येथे आलो येथे शुकदेवानी  तपस्या केली आहे येथे मार्कण्डेश्वर महादेवाचे मंदिर आहे
तेथून काही अंतर चालल्यावर एक कुटी दिसली स्वामी म्हणाले थाब  ह्ये कुंतीला साधुकुटी म्हणतात आम्ही आत गेलो
 स्वामी म्हणाले इथे शांत बस व अनुभव घे मी सर्व सामान बाजूला ठेवले व शांत बसलो स्वामी पण माझ्या पासून काही अंतरावर बसले
जे घडले त्याचे काय वर्णन करू माझ्या कडे शब्द नाहीत एवढंच सांगेन खरंच जन्माचे सार्थक झाले बर काही घडलं आठवलं तरी तिकडे धावत जावेसे वाटते
खऱ्या आध्यात्मिक लहरी खरी तपस्येची तप्त भूमी काय असते हे पूर्ण जाणवले असो किती लिहले तरी लिहण्यात सुद्धा माझी तृप्ती होणार नाही असो
तेथेच दुपारी  थांबलो साधना केली
येथून जाण्याची इच्छा होत नव्हती निघताना डोळ्यात खरच पाणी आले
पुढे निघालो पाटणा ओरी वरून कोटेश्वर महादेव येथे आलो तेथे महादेव मंदिरात राहण्याचे ठरवले मंदिरातून सदावर्त ( शिधा )  मिळाले स्वामी करता चपाती व बटाट्याची भाजी  बनवली नंतर स्नान साधना पूजा केली नंतर  स्वामींना भोजन दिले नंतर मंदिरातून मला  दूध चपाती खाल्ली सर्व आवरून स्वामीनसमोर बसलो ते काय सांगतात खूप उत्सुकता आहे
स्वामीनीं बोलण्यास  सुरवात केली ते म्हणाले  बघ संख्या एकंदर दहा आहे नंतर कितीही मोठी संख्या बघितली तरी त्यातीलच  संख्या परत येतात आता मी तुला प्रत्येक संख्यचे वैशिष्ठ सांगती

एक )  - एकाक्षरी मंत्र - ओम
दोन )  - शरिरातील महत्वाच्या सर्व अवयवांच्या जोड्या आहेत. डोळे दोन, कान दोन, हात दोन, पाय दोन वगैरे
तीन)   - शंकर त्रिनेत्र, संगीताची अंग तीन, गायन, वादन आणि नर्तन आपल्याकडे तीन गुण मानले जातात. सत्व, रज आणि तम गुण. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे तीन योग आहेत.
चार)  - चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद सध्या सुरु आहे कलियुग, त्याआधी होत कृतयुग, त्रेतायुग. द्वापारयुग आणि चौथं कैलियुग म्हणजे झाली चार युग आपल्याकडे चार आश्रम सांगितले आहेत. ब्रह्मचर्याश्रम, ज्यामध्ये गुरुगृही राहून ज्ञान, अध्ययन केल्ण जातं. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम हे चार आश्रम. वाद्य चार प्रकारची असतात. तंतूवाद्य, वायूवाद्य, धातूवाद्य आणि चर्मवाद्य.
पाच) - पंचमहाभूतं कोणती. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश. देवाला नैवेद्य दाखवतो पंचामृताचा. त्यात असतं दूध, दही, तूप, साखर आणि मध. आपल्याला एक श्लोक माहीत आहे का
आहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरेत नित्यम महापातक नाशनम I
अशा पंचकन्या. पाच इंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय कान, नाक, त्वचा, डोळे, जीभ.
सहा) - शाळेत असताना सगळ्यांना सहा ऋतुंची नाव पाठ करावी लागली असतीलच. शरद, हेमंत, शिशिर, ग्रीष्म, वर्षा आणि ऋतुराज वसंत. सहा रस. गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू आणि खारट. माणसाचे शत्रू सुद्धा सहा ज्यांच्यावर विजय मिळवणं कठीण काम, क्रोध, मत्सर, मद, मोह, लोभ असे षडरिपू.
सात) - सप्तसूर. सारेगमपधनीसा सर्वांना माहीत आहेतच. आकाशातलं इंद्रधनुष्य सात रंगानीच बनलेलं असतं. व्यास, वाल्मिकी, विश्वामित्र, वाशिष्ठ, दधिची, अगस्ती आणि अत्री सप्तर्षी ही माहीत असतील.
आठ) - आठ म्हटल्यावर सर्वप्रथम आठवतात. अष्टविनायक प्रत्येकाचं श्रध्दास्थान त्याचा महिमा प्रत्येकजण जाणतो.
शास्त्रीय नृत्यकलेत भरतमुनींनी अष्टनायिका सांगितल्या आहेत. त्यांची नावे अभिसारिका, खंडीता, विप्रलब्धा, उत्कंठा, स्वाधिनपातिका, वासकसज्जा, कलहान्तारिता आणि प्रोषितभर्तृका.
नऊ) - नवरत्नांची वेगळी ओळख सांगायला नकोच. हिरा, पोवळ, पाचू, माणिक, गोमेद, पुष्कराज, नील मोती अकबर बिरबलाच्या गोष्टी सर्वांनी लहानपणी वाचल्या असतील त्याच अकबराच्या दरबारात असणार्‍या नवरत्नांबद्दल तुम्ही वाचलं असेलच. त्यात बिरबल आणि तानसेन ही नावं आपण ओळखतो. इतर नावं अबूल फजल, अबूल फैजी, राजा तोरडमल, पन्हा भांड कवि, गंगाभट, संस्कृत तज्ज्ञ कवि जगन्नाथ पंडीत नऊ रस नवग्रह आहेत.
दहा) - दहा दिशा आहेत. पृथ्वीवर असूरांचा नाश करण्यासाठी विष्णूने अवतार धारण केले ते सुध्दा दहा, ज्यांना आपण दशावतार म्हणतो.
आता झोप  उद्या  दुसरा विषयी बघू
क्रमश:---
स्वामी खरच रोज जे जे सांगतात  ते नवीनच असते व विचार करायला प्रवृत्त करते
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
              🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--- भाग  ५९
रोजच्या प्रमाणे उठून  ध्यान स्नान साधना व पूजा करून  पुढे जाण्यासाठी तयार झालो कोटेश्वर मंदिरातील  पुजाऱ्याने  स्वामींना चहा पिण्याकर्ता थांबवले मला तर घेण्याचं प्रश्नच नव्हता  इथे परत स्वामींनी विचारले  अरे किती दिवस झाले साधना सुरु करुन मी म्हंटल  खरंच मी दिवस मोजलेच नाही स्वामी परत हसले असो
पुढे निघालो कोटेश्वर वरून सिसोदरा  वरून  कादरोज येथे आलो दुपारी ह्या ठिकाणी थाबण्याचे ठरवले ह्या ठिकाणी कार्तिकस्वामीनीं तप्सया केली आहे ह्या ठिकाणी आश्रमातर्फे  भोजन होते स्वामी म्हणाले काही बनू नकोस मी इथे आश्रमात जेवण करीन मी तेथील  महाराजाना विचारले चपातीत  रामरस ( मीठ ) आहे का त्यांनी हो सांगितले म मी जेवण न करण्याचा निर्णय घेतला माध्यांनचे  स्नान संध्या करून स्वामींचे भोजन होई पर्यत विश्राम केला
दुपारी पुढे निघालो रस्त्यात विचार करत होतो की आज रात्री स्वामी काय सांगतील हा विचार करतच होतो तेवढ्यात पाठीमागुन स्वामीनीं  आवाज दिला अरे काय विचार करतोस रोटरी होऊ दे मग रात्रीच रात्री बघू आत्ता अजपाजप का बंद केलास
चूक लक्षात आली खरंच आश्चर्य आहे माझा मनात विचार आला की लगेच स्वामीना कळते असो
चालत चालत  वराछा वरून आसा येथे आलो याठिकाणी श्री दगडू महाराज ह्यांचा आश्रम आहे ह्याचा ठिकाणी दगडू महाराजानी जलसमाधी घेतली  स्वामी म्हणाले आज आपण येथे  मुक्काम करू आश्रमात राहण्याचे ठरवले तेथील व्यवस्थापकाना माझया साधनेविषयी सांगितले ते म्हणाले ठीक आहे रामरस ( मीठ ) तेल न टाकता तुमच्या पुरत्या दोन चपात्या बनवू  म  संध्याकाळचे स्नान साधना पूजा केली नंतर मी व स्वामी  आश्रमाच्या भोजन शाळेत गेलो तेथे प्रथम स्वामीचे भोजन झाले नंतर मी दूध चपाती  खाऊन ज्या खोलीत  आम्ही थांबलो तेथे आलो स्वामी  समोर बसलो  स्वामी हसले म्हणाले आज काय ऐकायचं मी म्हणालो तुम्ही जे ज्ञान  द्याल ते ग्रहण करीन स्वामी  थोडा वेळ शांत बसले
 मग स्वामी म्हणाले आपण रोज जे स्नान करतो त्या विषयी मी तुला आज सांगतो स्नानाच्या वेळा त्याचे कारण नीट ऐक
   स्नान म्हणजे शरिराची शुद्धि करणे._
_सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खावु पिउ नये. जितके महत्व शास्त्रात मंत्र आणि नामस्मरणाला आहे, तितकेच महत्व  स्नानाला  सुद्धा आहे._
_🌺अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेलाच झाली पाहिजे._

 🌺  *ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे, 4 ते 6.*
 🌺  *मनुष्याची अंघोळ म्हणजे,    6 ते 8.*
  🌺 *राक्षसांची अंघोळ म्हणजे     8 ते 10.*
  🌺 *प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे     10 ते 12.*
  🌺 *त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड.*
   🌻 *ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ.*
   ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि  मनुष्याला एक वेगळाच उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते. मानसीक ताकद वाढते._
🌺 *6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते.*
   ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्यासारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो. पण ब्रह्ममहुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही. फक्त मनुष्य सर्व बाबतीत सम प्रमाणात असतो. सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ति मिळते._
   🌺  *राक्षसांची अंघोळ 8 ते10*
_ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो. मत्सर लोभ जास्त स्वरुपात मनुष्यात येतो. दैविक शक्ति फार कमी मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जड़तात. अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो. कामात उत्साह नसतो. आळशीपणा काम करतांना सतत येतो त्यामुळे मनुष्य सारखा चिड़चिड़ा होतो._
 🌺   *प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12*
_ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते. काम करायचा कंटाळा येणे, सतत झोपुन राहणे, खुप खाणे. त्यामुळे असिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात. मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही. तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वतावर ताबा राहत नाही._
_🌻तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे.
   तरच त्याची शक्ति मिळेल._
_म्हणून मनुष्याने_
_   कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे.‼_
_स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले

तर काही हरकत नाही पण 🌻स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे.
_तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर मग विवीध आजारांना आमंत्रणच होय._
_ कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते. म्हणून स्नान देवपूजा ह्या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. आणि_  आपणही ते जपलेच पाहिजे
झोप आता उद्या  नवीन विषय बघू
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड



💐  जय  गुरुदेव 💐
                 🌹 परिक्रमा 🌹
क्रमश:-- भाग  ६०
     नित्यनियमाने  पहाटे उठून  ध्यान स्नान साधना पूजा झाली  पूजा झाल्यावर  पुढे निघालो
    गेले दोन दिवस मनात सदोदित विचार येत होता की मी नागाची साधना केंव्हा सुरु केली मातारामनी सांगीतलेले दिवस पूर्ण झाले का काहीच आठवत नव्हते स्वामींनच्या  सहवासाने व त्यांच्या अमृत ज्ञानवणीने काहीच आठवत नाही दिवस कसा उगवत होता सर्व साधना पूजा कशी होत होती व दिवस कसा मावळत होता काहीच कळत नव्हते एकदम आनंदात चालले होते असो
मी हा विचार करत असतानाच स्वामीनीं आवाज दिला व म्हणाले  विचार कसला करतोस जेव्हढी साधना झाली असेल तेव्हढी होऊ दे तो विचार करून अजपाजप का थाबवतोस  जास्त  साधना झाली तर काही वाईट होणार नाही
मला खरंच स्वामी भेटल्यापासून हे कोडेच आहे की माझ्या मनातले  हे लगेच ओळखतात असो मी परत मनात जप सुरु केला व पूढे चालू लागलो
पुढे पंचमुखी हनुमान , गिरनार गुफा,पणेथा पार करून दुपारी वासणा इंद्रेश्वर महादेव मंदिरात दुपारच्या साधनेकरता  थांबलो तेथे अन्नक्षेत्र आहे स्वामींनी तेथे भोजन केले माझी दुपारची साधना करून थोडा वेळ थाबुन पुढे निघालो पुढे वेलूगाम भावपूरा पार करून सरसाद है ठिकाणी आलो येथे गुप्त गोदावरी स्थान आहे ह्या विषयी अनेक कथा आहेत येथेच दुर्वास ऋषींची परिक्रमा खंडित झाली ह्याची पण एक कथा आहे असो
स्वामी आज्ञेने येथे मुक्क्म करायचे ठरवले तेथे एका ब्रम्हवृदाच्या झोपदीबाहेर आंम्ही थांबायचे ठरवले त्या ब्राम्हणाने आम्हास रात्री भोजन देतो सांगितले
संध्याकाळची स्नान साधना पूजा करून स्वामींचे भोजन झाल्यावर मी दूध चपाती खाल्ली व सर्व आवरून स्वामींनसमोर बसलो आज काय ऐकायला मिळणार  हाच विचार मनात आला
स्वामी म्हणाले आज तू प्रश्न विचार मी उत्तर देतो
       मी विचारले स्वामी साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ? साधकाने साधन काय व कसे करावे ? साधनाने साधकाला काय प्राप्त होते ?
  स्वामी  हसले व बोलू  लागले
 सद्गुरूंनी सांगितलेले साधन जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनाचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. सद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनाचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधन करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधन करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधन करणे या परते दैवच नाही. साधनाखेरीज अन्य वासना असू नये. साधन न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधन सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधन करावे. साधकाने झटून साधन करावे व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.ह्याचा  पुढे  उद्या बघू झोप आता निरिच्छेने झोपण्या करता उठलो
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड